पाटणा येथे सुरु असलेल्या विरोधकांची बैठकीमध्ये बोलताना राहूल गांधी यांनी जरी मतभेद असले तरी लोकशाहीच्या विचारधारेचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतर विरोधी नेत्यांसह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “मतभेद असले तरी सर्व पक्ष एकत्र लढण्यासाठी एक समान व्यासपीठावर एकत्र येतील.” “मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीश कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, पुढील बैठकीत या चर्चेला अधिक विस्तृत नेऊ. विरोधी ऐक्य ही एक प्रक्रिया आहे, जी पाटणामधून पुढे जाईल.” असेही राहूल गांधी यांनी म्हटले आहे.