1.8 कोटी प्रवाशांसाठी देणार सेवा : रेल्वे मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय रेल्वे आपल्या 1.8 कोटी प्रवाशांना उत्तम खानपान सेवा देण्यासाठी विविध बदलांसह विस्तार योजनांवर काम करत आहे. त्याचबरोबर देशातील 1275 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर सुमारे चार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज यावेळी मांडण्यात आला आहे.
यामध्ये दिल्लीत झालेल्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत खानपान सेवा आणि रेल्वे स्टेशन विकास-अमृत भारत स्टेशन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, अशी माहिती देण्यात आली की भारतीय रेल्वेमध्ये सुमारे 1.8 कोटी प्रवासी प्रवास करतात आणि प्रवाशांसाठी रेल्वे तसेच स्थानकांमध्ये पुरेशा खानपान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
केटरिंग व्यवसायात आमूलाग्र बदल
प्रवाशांना केटरिंग सेवा स्टॅटिक युनिट्स किंवा मोबाइल युनिटद्वारे पुरवल्या जातात. भारतीय रेल्वेमध्ये जन अहरन आऊटलेट्स, फूड प्लाझा आणि रिफ्रेशमेंट रूम्ससह 9342 लहान आणि 582 प्रमुख स्टॅटिक युनिट्स असल्याची माहितीही रेल्वेने यावेळी दिली आहे.
स्थानकांचं आधुनिकीकरण
या योजनेत स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेने 1275 स्थानकांचे काम हाती घेतले आहे. इमारतींमध्ये आवश्यक त्या सर्व सुधारणा, दिव्यांगांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, आवश्यकतेनुसार ‘रूफ प्लाझा’ अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.