बुधवारी कमाल 36.2 तर किमान 24.4 तापमान
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडाभरापासून शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही बेळगावच्या पाऱयामध्ये वाढच असल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसाने काही भागात झोडपून काढले आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वीच बेळगावातही पावसाची हजेरी लागली. तरीदेखील बुधवारी कमाल तापमान 36.2 तर किमान तापमान 24.4 इतके होते. तसे पाहिल्यास जोराचा पाऊस झाल्यास तापमानात घट होण्याची शक्मयता असते. मात्र अजूनही उष्म्यात घट नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळच्या सत्रात तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. सकाळपासूनच उष्म्यापासून बचाव करण्यासाठी पंख्यांचा वापर करण्यात येत आहे. सायंकाळच्या सुमारास पाऊस पडल्याने अनेक जण समाधान व्यक्त करत आहेत. ऐन उन्हाळय़ात पावसाळी वातावरण तयार झाल्याने बेळगाव आणि परिसरात सध्या हवामानात बदल झाला आहे. या पावसाने ठिकठिकाणी मारा केला असून बुधवारीही ढगाळ वातावरण कायम होते. उष्म्यामुळे सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत होती.
अचानक वातावरण बदलाने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, शेतीच्या मशागतीचेही काम खोळंबले आहे. मागील काही दिवसांपासून बऱयापैकी पाऊस झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगावच्या पाऱयातही वाढच होत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिक छत्रीचा वापर करू लागले आहेत.
उष्म्याने नागरिक हैराण
मागील महिन्याभरापासून ढगाळ वातावरण कायम राहिले आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत रात्री थंडी आणि दिवसा उकाडा असे वातावरण होते. मात्र सध्या ते गायब झाले आहे. उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. शेतीकामासाठीही पुरेसा पाऊस झाला. मात्र मशागतीसाठी उघडीप मिळेनाशी झाली आहे. शेतकरीही कुचंबणेत अडकले आहेत. उष्म्यामुळे अनेक शीतपेयांना चांगले दिवस आले आहेत. उष्म्यात सातत्याने वाढ होत असून यापुढेही यामध्ये वाढ होण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तविली आहे.