रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील आंबेशेत खाडीमध्ये कालवी काढायला गेलेल्या युवकाचा चिखलात रुतल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
रत्नागिरी शहरालगत असलेल्या आंबेशेत येथे खाडीमध्ये कालवी काढायला तरूण गेला होता. पौर्णिमा असल्याने आहोटीच्या वेळी खाडीत कालवी काढण्यासाठी ग्रामस्थ जात असतात. असाच हा तरुण कालवी काढण्यासाठी गेला होता. यावेळी चिखलात रुतल्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही. पाण्याला भरती आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी दिली.