मुलाचा विवाह होत नाही म्हणून तणावातून घेतला गळफास
प्रतिनिधी/गुहागर
आपल्या मुलाचा विवाह होत नाही म्हणून मनावर परिणाम करून घेऊन चिडचिडेपणातून मुलाच्या 65 वर्षीय आईने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सडेजांभारी येथे घडली.
भार्गिथी गोविंद आंबेकर (सडेजांभारी-देऊळवाडी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. गुहागर पोलीस ठाण्यात या बाबतची नोंद करण्यात आली आहे. भार्गिथी आंबेकर ही महिला सोमवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून बेपत्ता होती. मंगळवारी ती सकाळी 10 वा. सडेजांभारी-देऊळवाडी गुरवाचा आंबा येथे किंजळीच्या झाडाला साडीचा गळफास करून आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळली. ही महिला मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.