केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) मागील 5 वर्षांमध्ये सुमारे 2 लाख जणांची भरती करण्यात आली आहे. जुलैच्या अखेरपर्यंत बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्समध्ये 84 हजारांहून अधिक पदे रिक्त होती आणि ही पदे भरण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2017-2021 पर्यंत सीआरपीएफमध्ये सर्वाधिक 1 लाख 13 हजार 208 युवक-युवतींची भरती करण्यात आली आहे. 29,243 युवक-युवतींना एसएसबी अणि 17,482 जणांना बीएसएफमध्ये सामील करण्यात आले. मागील 5 वर्षांमध्ये सीआयएसएफमध्ये 12,482 जणांची, आयटीबीपीत 5,965 आणि आसाम रायफल्समध्ये 5,938 जणांची भरती करण्यात आली आहे.
चालू वर्षात जुलैपर्यंत 6 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 10,377 युवक-युवतींची भरती करण्यात आली. सीआरपीएफमध्ये 6,509 तर एसएसबीमध्ये 1,945 आणि बीएसएफमध्ये 1,625 पदे भरण्यात आली आहेत. आसाम रायफल्समध्ये 229 आणि सीआयएसएफमध्ये 69 जणांची भरती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 ऑक्टोबर रोजी एक भरती मोहीम सुरू केली होती. याच्या अंतर्गत पुढील 18 महिन्यांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 10 लाख कर्मचाऱयांची नियुक्ती करण्याचे लक्ष्य आहे. नवनियुक्त 75 हजारांहून अधिक जणांना नियुक्तिपत्र सोपविण्यात आले आहे.