लोकसभा आणि विधानसभा यांमध्ये महिलांसाठी आरक्षण येत असेल तर त्याचे स्वागतच असल्याचे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले. गणेश चतुर्थीच्या दिवशी शाहू महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना 23 टक्के आरक्षण दिले जाणार आहे त्या संबंधिचे विधेयक आज लोकसभेत माडण्यात आले. पत्रकारांनी आज याविषयी शाहू महाराज छत्रपती यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, “महिलांना लोकसभेत जर आरक्षण मिळणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. पण आरक्षण कशा पद्धतीने देणार आहेत ते सर्वांना समजायला हवे.
विरोधकांच्या मागण्या काय आहेत आणि कुठे घटनादुरुस्ती करणार आहेत. याबाबत सांगणे गरजेचे आहे. कॉमन सिव्हिल कोर्ट कायदा करण्याबाबत कानावर पडत आहे. यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. नंतर गडबडीत निर्णय घेतला असे व्हायला नको. चर्चा घेऊनच तो कायदा पास व्हावा. धनगर समाजाला वेगळ्या कक्षेत आरक्षण हवे आहे. त्याचाही विचार केला पाहीजे.” असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
संसदेच्या नविन वास्तुवर भाष्य करताना ते म्हणाले, “लोकसभा हे असे ठिकाण आहे जिथे सर्वांना आपले विचार व्यक्त करता येतात. तसेच काही चर्चाही करता येतात. जेणेकरून आपल्या सर्वांना लोकांसाठी आणि देशासाठी योग्य निर्णय घेता येतात. 1950 पासून घटना अस्तित्वात आली आहे. त्याच्या माध्यमातून आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून संसद महत्वाचे स्थान आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.