प्रतिनिधी/ सातारा
किर्तन प्रवचन म्हटले की त्याला धार्मिक बाज आला. महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार नाटककार अभिनेते असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणाया ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे यांनी सादर केलेल्या तीन दिवसाच्या आगळ्या कीर्तनाने सातारकर नागरिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.औचित्य होते श्री समर्थ सेवा मंडळाने आयोजित केलेल्या राजवाडा परिसरातील श्री समर्थ सदन येथील चातुर्मास कार्यक्रमातील कीर्तन उत्सवाचे.
सलग तीन दिवस सायंकाळी सादर झालेल्या या कीर्तनात चारुदत्त बुवा आफळे यांनी 26 जुलै हा कारगिल विजय दिन आहे. हे औचित्य साधत या कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून तीन दिवसीय कारगिल युद्ध चरित्र आपल्या कीर्तनात सादर केले …घनश्याम हा राम लावण्यारुपी, मनोबोध देवाचे नामस्मरण भजन करावेच पण अधिक ध्यान देखील करावे .म्हणजे उपा दैवताचे गुण विशेष आपल्यामध्ये प्रकट होतात .अख्यान कथा सादर करताना कारगिल युद्धातील योद्धा विक्रम बात्रा जो त्याच्या धाडसी वृत्तीमुळे शेरशहा म्हणून प्रसिद्ध होता, तो नेहमी सांगत असे की मी सीमेवरून येताना एक तर झेंडा फडकवून येईन किंवा हुतात्मा होऊन झेंडय़ात लपेटून येईन . दोन्ही वचने त्याने पूर्ण केली .पॉईंट 5140 जिंकून झेंडा फडकवला आणि पॉईंट 4875 लढताना जिंकला, पण हा विक्रम हुतात्मा झाला. याबाबतची सविस्तर माहिती आख्यानात देताना चारुदत्त आफळे यांच्या रसभरीत वर्णनाने सातारकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले .
त्यानंतर आपल्या कीर्तनात रामायणातील वाली -सुग्रीवा तील वालीचा दाखला देताना राम बलवान आहेत, सशस्त्र आहेत ,त्यांचे कोदंड अगस्ती ऋषींनी केले आहे .ते बलवंत आहेत,पण सक्रिय आहेत.वाली बलवंत असूनही रावणाला अटकाव करत नसे. मात्र या
वालीला रामाने अटकाव केला. समाजातील सगळ्यांनी समाजकंटकांना दरारा लावला पाहिजे .असा रामाचा आदर्श प्रत्येकाला घ्यावा असे सांगताना आपल्या आख्यानात कारगिल युद्धातील मनोज पांडे यांनी खालुबार हिल सर करण्यासाठी आपल्या हाताच्या कोपरांवर सरपटत जाऊन शत्रूच्या गोळ्या खात चाल करून चार बकर नष्ट केले व हुतात्मा झाला आणि शिखर मिळवले. म्हणजे गड आला पण सिंह गेला अशीच काहीशी परिस्थिती दिसत होती. हे सादर करताना आफळे बुवांनी कारगिल युद्धातील योगेंद्र सिंह यादवने कारगिल सीमा रांगेतील टायगर हिल जिंकले, तितकेच नव्हे शत्रूची पुढील चाल त्याला कळली ती बातमी भारत कार्यालयाला देऊन अनेकांचे प्राण वाचवले .वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या योगेंद्र सिंह जे आजही सैन्यात कार्यरत आहेत यांचा दाखला देत आपल्या कीर्तनात रामाचे चरित्र व रामनाम ही सुख देणारे आहे, आनंद देणारे आहे ,भय निवारण करणारे आहे त्यामुळे साधकाने भक्ती भावाने हे रामचरित्र भजले पाहिजे असे सांगत आपल्या तीन दिवसीय कीर्तनाची सांगता केली .
समर्थ सदन येथेच चारुदत्त बुवा आफळे यांची भाची रेशम खेडेकर यांनी दोन दिवस सादर केलेल्या कीर्तनामध्ये पहिल्या दिवशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा.. जाणे भक्तीचा जिव्हाळा ..या अभंगावर नवविधा भक्तीचे प्रकार उपस्थितापुढे सादर केले .भक्ती करताना भाव जाणता आला पाहिजे, मनापासून भक्ती केली पाहिजे आणि म्हणून श्रवण, मनन करताना जो मनापासून करतो तोच खरा श्रेष्ठ भक्त आहे .एक वेळ पांडित्य, विद्वत्ता कमी असेल तरी चालेल मात्र भगवंतप्राप्तीसाठी अशी भक्तीच महत्त्वाची आहे असे सांगत श्रीकृष्ण व सुदामा याचे उदाहरण यावेळी दिले. दुस्रया दिवशी क्रांतिकारक बालमुकुंद यांचे चरित्र सांगताना, संत तुकाराम महाराजांचा ..जे का रंजले गांजले.. हा अभंग घेत साधूची व्याख्या नक्की काय हे सांगताना केवळ वेष पाहून साधू ओळखू नका तर त्याची लक्षणे पहा आपल्याकडील जे आहे ते दुस्रयांना देत दुःख दूर करणारा तो खरा साधू .आजच्या युगात बाबा आमटे जे कुष्ठरोग्यांसाठी झटले ज्यांनी अशा परावलंबी लोकांना धीर देत प्रेरणा देत त्यांचे दुःख दूर करत त्यांना स्वावलंबी बनवले हे खरे साधूचेच लक्षण होते आणि बाबांनी प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे नेत या सर्वांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला असेही आपल्या कीर्तनात सांगितले.
दरम्यान, ह.भ.प.निहालबुवा खांबेटे, आंजर्ले यांचेही कीर्तन झाले. पहिल्या दिवशी त्यांनी पूर्वरंगाच्या निरुपणासाठी “लोळे विषयात चंचल हे चित्त” हा श्री स्वामी स्वरूपानंद यांचा संजीवनी गाथेतील अभंग घेतला होता. इतर भौतिक परिस्थिती प्रतिकूल असूनही आपल्या अंतःकरणाला सततच्या परब्रह्माच्या चिंतनाची सवय लावून आपले मानवी जीवन सर्वांगीण समाधानी कसे राहील याबाबत सखोल विचार भारतीय तत्त्वज्ञानाने कसा केला याचे निरुपण अनेक संतांचे आणि अनेक शास्त्राची वचने यासह बुवांनी केले. याच दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणेश लीला वर्णन करणारे गोकर्ण महाबळेश्वर हे कथानक आख्यान रूपामध्ये सादर केले. रावणाकडे सर्व भौतिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती अनुकूल असूनही मनामध्ये भगवंताच्या चिंतनाच्या ऐवजी आपल्या सर्वस्वाचा अहंकार असल्यामुळे आयुष्यभर वाटय़ाला अशांतता कशी आली हे या आख्यानाच्या माध्यमातून बुवांनी उलगडून दाखवले.
दुस्रया दिवशी बुवांनी “जे का रंजले गांजले” या तुकोबांच्या प्रसिद्ध अभंगाच्या निरुपणातून पूर्वरंगात संताचा स्वभाव कसा असतो, त्यांनी जो चिंतनाचा मार्ग निवडला त्यावरूनच आपण आयुष्यभर चालत राहिलो तर आनंदाची प्राप्ती कशी होते हे उलगडून दाखवले. तसेच त्या दिवशी कथानक म्हणून प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची एक अद्भुत कथा सांगितली. त्यामधे ब्रह्मावर्ताच्या श्री आपटे बुवा या कीर्तनकार बुवांना आपल्या कीर्तनाच्या सादरीकरणाचा अहंकार झाल्याने ख्रया वर्माचा विसर पडून त्यांना प.प.थोरल्या स्वामी महाराजांनी आपल्या अल्पशा संगतीमुळे आणि चमत्काराने सुद्धा कशी समज आणून दिली ते विविध कीर्तनी पदांच्या साहाय्याने रंगवले.
दि.26 जुलै ते 28 जुलै दरम्यान पुणे येथील समर्थभक्त सौ .सुनीता ताई सहस्त्रबुद्धे यांचे प्रवचन होणार असून 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान सातारा येथील युवा कीर्तनकार ध्रुव पटवर्धन यांचे कीर्तन होणार आहे .