वारणानगर / प्रतिनिधी
केखले ता. पन्हाळा येथील शिवाजी बापू गिरवे यांच्या शेतातील साधारणपणे सात ते आठ झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. फळ लागण होणाऱ्या या झाडांची अनोळखी लोकांकडून कत्तल झाली असल्याने गिरवे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. शिवाजी गिरवे यानी याबाबत वनविभाग आणि महसूल विभाग कडे तक्रार नोंदवलेली आहे आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेले आहे .
झाडे लावा झाडे जगवा अशा आशयाची जाहिरात केंद्र आणि राज्य शासन करत आहे. लावलेले झाड जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. शिवाजी बापू गिरवे यांनी त्यांच्या शेतामधील बांधावर चार शेवग्याची एक आंब्याचं,आणि तीन नारळाचे झाडे लावलेली होती.
काही अज्ञातांनी या झाडांची कत्तल केलेली आहे. ही झाडे साधारणपणे चार ते पाच वर्षांपूर्वी लावली होती. यापैकी शेवगा आणि आंब्याच्या झाडाला फलधारणा देखील झालेले होती. या झाडांची कत्तल काही कुप्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे. याबाबत लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी गिरवे कुटुंबीयांनी केलेले आहे.