आधुनिक यंत्राद्वारे हंगाम साधण्याकडे सर्रास शेतकऱयांचा कल
वार्ताहर / काकती
काकती शिवारात खरीप भातपेरणीला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, गुरुवारी दुपारी 2 वाजता झालेल्या पावसाने पेरणीचे काम खोळंबले आहे. बैलजोडींची संख्या गावात मोजकीच असून ट्रक्टरच्या चार नांगरटाळांनी व आधुनिक पेरणी यंत्राद्वारे शेतकरी हंगाम साधत असून 10 टक्के पेरणी झाली आहे.
मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्राच्या अगोदर यंदा अधूनमधून चांगला पाऊस झाला असल्याने पूर्व मशागतीची कामे झाली आहेत. रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने मृग नक्षत्रात पाऊस चांगला होणार, असे अनुमान शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या वषी मृग नक्षत्र सुरू होताच 5 ते 11 जूनपर्यंत दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली होती.
सध्या पेरणीनंतर पाऊस झाल्याने भात उगवणीला पोषक झाले आहे. मोजक्मयाच शेतकऱयांच्या बैलजोडी आहेत. ट्रक्टरने सिद्दाप्पा मोळेराखी, शिवाजी धोणजी तर आधुनिक स्वयंचलित पेरणी यंत्राद्वारे श्रीपाद देसाई असे प्रायोगिक शेतकरी पेरणीची कामे उरकत आहेत.
उघडीपीचा हंगाम साधण्याच्या तयारीत
यंदा ऊस पिकाची लागवड वाढली असून 1200 एकरात भातपेरणी व लागवडीचे उद्दिष्ट आहे. उघडीपीचा हंगाम साधल्यास 96 टक्के भातपेरणी होणार असून केवळ 4 टक्के रोप लागवड होणार आहे. येत्या आठ तारखेपर्यंत उघडीप मिळाल्यास 40 टक्के, त्यानंतर मृग नक्षत्राच्या उघडीपीनंतर 54 टक्के असे मिळून 96 टक्के पेरणी होणार आहे.
प्रत्येक शेतकऱयाने पेरणी हंगाम साधण्यासाठी जुळवाजुळव केली आहे. बियाणासाठी इंद्रायणी भातवाणाला शेतकरीवर्गाने सर्वाधिक पसंती दिली आहे. शुभांगी, सोनम आदी भातवाणांची निवडही त्यांच्याकडून झाली आहे. गेल्या वषीच्या तुलनेत रासायनिक खतांचे दर 25 टक्क्मयांनी वाढले असून युरिया खताची किंमत मात्र रु. 300 जैसे थे आहे. पेरणीकरिता मिश्रखतांचा वापर शेतकरी करीत आहेत.