3 महिन्यांत संशयित रुग्णसंख्या 45 वर, सोमवारी 9 रुग्णांची नोंद, आरोग्य केंद्राकडून धूरफवारणी सुरू
वार्ताहर /केपे
केपे तालुक्मयातील मोरपिर्ला पंचायत क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांत डेंग्यू रुग्णांच्या संख्खेत वाढ झाली असून आतापर्यंत 45 संशयित डेंग्यू रुग्ण सापडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी एकाच दिवशी पंचायत क्षेत्रात एकूण 9 रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्या वाढू नये याकरिता माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या मदतीने बाळ्ळी आरोग्य केंद्रातर्फे पंचायत क्षेत्रात धूरफवारणी सुरू करण्यात आली आहे.
मोरपिर्ला पंचायतीत सुमारे दोन हजारांच्या आसपास लोकवस्ती असून या पंचायतीत 90 टक्क्यांहून जास्त अनुसूचित जमातींचे लोक राहतात. बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत हा परिसर येतो. गेल्या मार्च महिन्यात पहिल्यांदा गाळी या परिसरात डेंग्यूचा संशयित रुण सापडला होता. त्यानंतर या संख्येत वाढ होत गेली व त्याचा प्रसार एका वाडय़ापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण मोरपिर्ला भागात झाल्याने सर्व गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावागावात धूर फवारणीस सुरुवात
आता पावसाचे दिवस सुरू झाल्यावर यात आणखी वाढ होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसार थांबवण्याकरिता आरोग्य केंद्राने कवळेकर व स्थानिक पंचायतीच्या मदतीने गावागावात धूरफवारणी करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या डॉ. ममता काकोडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मार्चपासून असे संशयित डेंग्यू रुग्ण सापडत आहेत व ती संख्या 15 एवढी आहे. त्यांची संख्या आता कमी होत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पंचायतीच्या सहकार्याने उपाययोजनेची मोहीम चालू आहे. लोकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे काकोडकर यांनी सांगितले.
मार्चमध्ये सापडला होता पहिला रुग्ण
स्थानिक पंच दिनेश गावकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मार्चमध्ये गाळी या परिसरात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर तीन महिन्यांत ही संख्या 45 वर गेली आहे. सोमवारी कानिबाग येथे 4 व संपूर्ण पंचायत क्षेत्रात मिळून 9 रुग्ण एकाच दिवशी सापडले. आरोग्य केंद्राच्या सहकार्याने व माजी उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी कर्मचाऱयांच्या ये-जाकरिता वाहतूक व्यवस्था केल्याने तसेच धूरफवारणीसाठी लागणाऱया डिझेलची व्यवस्था केल्याने दाबे, मोरपिर्लासह काही भागांत फाँगिंगचे काम पूर्ण केले आहे व राहिलेल्या परिसरांत काम चालू आहे. याकामी सरपंच व अन्य पंचांचाही पाठिंबा मिळत आहे, असे गावकर यांनी सांगितले. सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन रेंजबाहेर असल्याने त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेता आली नाही.