काकती पोलिसांच्या बेदरकारपणामुळे शांततेला सुरुंग
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस यंत्रणेची धडपड सुरू असताना काकती पोलिसांच्या बेदरकारपणामुळे गौंडवाड (ता. बेळगाव) येथे रविवारी रात्री पुन्हा दगडफेकीची घटना घडली आहे. त्यामुळे काहीकाळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
परिस्थिती आटोक्मयात आणून गावात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी असणारे काकती पोलीस स्थानकातील अधिकारी मात्र अशा घटनांकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. गौंडवाड येथे काहीच घडले नाही, अशी माहिती सोमवारी रात्रीपर्यंत काकती पोलीस स्थानकातून दिली जात होती. 18 जून रोजी रात्री सतीश राजेंद्र पाटील (वय 40) या युवकाच्या खुनानंतर गौंडवाडमध्ये दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातही पोलिसांचा बेदरकारपणा दिसून आला होता. त्याचवेळी वरि÷ अधिकाऱयांनी अधिकाऱयांची कानउघाडणी केली होती. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी फोनच उचलला नाही. उपलब्ध माहितीनुसार चैतन्य वाईंगडे यांनी घरावर व वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी भरमा, ज्योतीकिरण व आकाश या तिघा जणांवर फिर्याद दिली आहे. गणेशोत्सव बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार बेळगावला आहेत.
परिस्थिती बिघडण्याची भीती…
अशा घटनांवर बारकाईने नजर ठेवण्याची सूचना वरि÷ अधिकाऱयांनी देऊनही काकती पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्षच केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मोठी घटना घडूनही पोलिसांनी त्याचा बोध घेतला नाही. पोलिसांच्या या बेदरकारपणाची वरि÷ांनी दखल घेतली नाही तर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.