सांगली प्रतिनिधी
धान्यापासून वंचित असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे, विभक्त रेशनकार्ड धारकांनाही धान्य मिळाले पाहिजे, पुरवठा विभागातील भ्ष्टाचार थांबला पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.
मोर्चाला विश्रामबाग मधील क्रांती नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुषहार घालून अभिवादन करून प्रारंभ करण्यात आला. मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी, रेशन कार्ड धारकांना धान्य मिळालेच पाहीजे, धान्य आमच्या हककाचे नाही कुणाच्या बापाचे, गोर गरीबाचे धान्य हिसकावुन घेणाऱ्याचा धिक्कार असो, पुरवठा विभागातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे अश्या घोषणानी परिसर दणाणून सोडन्यात आला घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला.
या वेळी बोलताना खराडे म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पात्र रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणे बंद झाले आहे याशिवाय अनेक गावात जमीनदार,व्यवसायिक, उद्योजक यांना धान्य मिळते मात्र रोजगाराला जाणाऱ्या मजुराला भूमिहीन लोकांना धान्य मिळत नाही हे वास्तव आहे तसेच अलीकडे विभक्त कुटूबानी नवीन रेशन कार्ड काडले असेल तर त्यांनाही कोटा नाही म्हणून धान्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
जुनी रेशन कार्ड नवीन करून तातडीने मिळत नाहीत, नवीन रेशन कार्ड ही लवकर मिळत नाहीत रेशन कार्ड काढण्यासाठी दलालाची साखळी आहे दलाल मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांची लूट करत आहेत ही साखळी मोडण्याची आवश्यकता आहे ज्यांना धान्य मिळते त्याच्याही वजनात काटा मारी केली जाते अनेक वेळा धान्य आले नाही म्हणून दिले जात नाही रेशन दुकानदार आपल्या मर्जीनुसार ,आपल्या वेळेनुसार धान्य वाटप करतात, जिल्ह्यातील सर्व दुकाने शासकीय वेळेनुसार सुरू राहिली पाहिजेत त्यानंतर पुरवठा अधिकारी आशिष बार्गुल यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी जिल्ह्याला नवीन कोटा आलेला आहे त्यानुसार प्राधान्य गटा अंतर्गत अर्ज करावेत सदर अर्ज तालुक्याच्या ठिकाणी करून ग्राम सभेचा ठराव करून ती यादी सोबत लागणारी कागद पत्रे जोडावित पात्र लोकांना धान्य सुरू करू यावेळी रावसाहेब पाटील ,सुधाकर पाटील, पिर्गोंडा पाटील, संजय बेले यांच्यासह कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.