बदलत्या हवामानामुळे शेतकरी अडचणीत
प्रतिनिधी/ बेळगाव
थंडीनंतर अचानकपणे हवामानामध्ये बदल झाला. त्यानंतर शनिवारी सायंकाळ नंतर शहरामध्ये काही भागात पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा लहरी हवामानाचा अनुभव बेळगावकरांना आला आहे. थंडीच्या दिवसात पाऊस झाला. सध्या शेतकरी भाताची सुगी व मळणी करत असतानाच हा पाऊस आल्याने शेतकऱयांना मात्र मोठा फटका बसणार आहे. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली होती. सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहर परिसर व उपनगरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि उष्म्यामध्ये वाढ झाली होती. थंडीही गायब झाली. शनिवारी सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील फेरीवाले, भाजी विपेते व इतर विपेत्यांची काहीशी तारांबळ उडाली होती. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱयांच्या मळण्या आणि सुगीचे काम आता खोळंबण्याची शक्यता आहे.
बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्याही समस्या
गेल्या काही वर्षापासून लहरी हवामानामुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. पाऊस कधी येईल याची शाश्वती नाही. ऋतुनुसार हवामानामध्ये बदल होत जातो. मात्र गेल्या काही वर्षामध्ये हिवाळय़ात पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे थंडीच गायब झाली आहे. यावषीही केवळ आठ दिवस थंडी पडली होती. त्यानंतर उष्मा वाढत आहे. अचानकपणे पाऊस पडू लागल्याने सर्वांचीच तारांबळ उडत आहे. या बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत.
सांबरा परिसराला पावसाने झोडपले
पूर्व भागात सुगी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच तालुक्मयाच्या पूर्व भागातील सांबरा, बाळेकुंद्री खुर्द परिसराला शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱयांच्या भातमळण्या पावसात सापडल्या आहेत त्यामुळे शेतकऱयांची एकच तारांबळ उडाली असून त्यांना मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अचानक आलेल्या पावसाने मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द व परिसरातील 50 हून जास्त भात मळण्या सापडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी मोठय़ाप्रमाणात मळण्या घातल्या होत्या.
कडोली भागात अवेळी पावसाची हजेरी
शनिवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक खळय़ांतील मळणीवर पाणी फेरले आहे. शनिवारी रात्री कडोली भागातील शेतकरी मळणी वाचविण्यासाठी धावपळ करत होते. परिणामी अवेळी आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अवकाळी दमदार पावसामुळे अक्षरशः साऱयांचीच दाणादाण उडविली आहे. कापून ठेवलेली भात पिके व मळण्यांवरही पाणी फेरल्याचे चित्र दिसून आले. मध्यंतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र औषधाची फवारणी केली होती. सध्या भात पिक तसेच इतर पिके जोमात होती. तालुक्मयातील काही भागात मळणींची कामे आटोपली आहेत. मात्र कडोली भागात सुगीला जोरदार सुरूवात असताना शनिवारी पाऊस पडल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.