क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोल्हापूर, सावंतवाडी, म्हापसा, तरुण भारत बेळगाव, बेळगाव रिजनल संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला.
आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित लोकमान्य प्रिमियर लीगच्या पहिल्या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 116 धावा केल्या. त्यात संजय दळवीने 49 तर अविनाश मोरेने नाबाद 16 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पुणे रिजनल संघाने 8 षटकात 8 गडी बाद 53 धावाच केल्या. त्यात रोहितने 17 धावा केल्या. या सामन्यात संजय दळवी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात मडगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 29 धावा केल्या. त्यात किसनने 10 धावा केल्या. त्याला उत्तर देताना सावंतवाडी संघाने 3 षटकात बिनबाद 30 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. सावंतवाडीतर्फे पंकजने नाबाद 22 धावा केल्या. पंकजला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तिसऱ्या सामन्यात मुंबई रिजनल संघाने 8 षटकात 4 गडी बाद 57 धावा केल्या. त्यात सागर गायकवाडने 24 तर उमेश सासणेने 15 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना म्हापसा संघाने 8 षटकात 6 गडी बाद 58 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात मयुरवीरने 11 व गोविंदने 13 धावा केल्या. मयुरवीरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. चौथ्या सामन्यात बेळगावा कॉर्पोरेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 58 धावा केल्या. त्यात गणेश कंग्राळकरने 22, अमर खणगावकरने 17 तर प्रतिक बाळेकुंद्रीने 11 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना तरुण भारत बेळगावने 7 षटकात 4 गडी बाद 60 धावा करत सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात संतोषने नाबाद 30 धावा केल्या. संतोषला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पाचव्या सामन्यात बेळगाव रिजनल संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 134 धावा केल्या. त्यात अजय भोसलेने 32, प्रमोद पालेकरने 34 व भाऊ कुराडेने 13 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पुणे रिजनल संघाने 8 षटकात 4 गडी बाद 78 धावाच केल्या. त्यांच्या योगेशने 20, अंगारने 22 तर रोहितने 10 धावा केल्या. अजय भोसलेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सहाव्या सामन्यात मॅनेजमेंट संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 31 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडीने 3 षटकात 1 गडी बाद 34 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यांच्या हेरेकरने 15 तर मयुर पिंगुळकरने 19 धावा केल्या. फेदक गोलंदाजी करणाऱ्या अमितला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सातव्या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 52 धावा केल्या. त्यात सागर दळवीने 17 तर विनायक देसाईने 13 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना म्हापसाने 6 षटकात 4 गडी बाद 53 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात योगेशला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.