आपल्या खिशावर परिणाम होण्याचे संकेत ः आजपासून नवे नियम होणार लागू
नवी दिल्ली
गणरायाच्या आगमनासोबत बुधवारी ऑगस्ट महिनाही समाप्त झाला आहे, आणि आजपासून सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. आजपासून व्यवहारातील काही नियम बदलणार असल्याने आता या बदलांचा परिणाम आपल्या खाशावर कसा होणार हे खालील मुद्यांवरुन आपण पाहणार आहोत.
सदरच्या नियमावलीत यमुना एक्सप्रेस वे, जनरल इन्शुरन्स, नॅशनल पेन्शन स्कीम, प्रॉपर्टी खरेदी आणि नवीन गाडी खरेदी आदी संदर्भातील नियम आता बदलणार असल्याची माहिती आहे. यातील सर्व नियमांची माहिती खालील प्रमाणे.
1.द्यावा लागणार जादा टोल
यमुना एक्सप्रेस वे इंडस्ट्रीयल डेव्हलपेंट अथॉरिटी यांनी टोलच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. हा वाढलेला टोल कर 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. लहान वाहनांवर प्रति किलोमीटर 10 पैसे जादा टोल घेणार. यामध्ये मोठय़ा व्यावसायिक वाहनांवर प्रति किलोमीटर 52 पैसे जादाचा टोल द्यावा लागणार आहे. याचा परिणाम हा लोकांच्या खिशावर होणार असल्याचे संकेत आहे.
2.प्रॉपर्टी खरेदी करणे होणार महाग
जर का आपल्याला आता प्रॉपर्टी घेण्याची योजना असेल तर आता जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये 1 सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घर आणि फ्लॉटसह सर्व प्रॉपर्टीची खरेदी महाग होणार आहे. कारण सरकारने गाझियाबादचा सर्किट रेट वाढविला असल्याने हा परिणाम होण्याची माहिती देण्यात आली आहे.
3.आता गॅस पुन्हा महागणार
1 सप्टेंबर रोजी एलपीजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या किमतीत बदल होतात. यामध्ये पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा बदल करण्याची शक्यता आहे.
4. एजंटला कमी कमिशन
आयआरडीएआय यांनी जनरल इन्शुरन्सच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. यामुळे आता इन्शुरन्स कमीशनवर एजेंटना 30 ते 35 टक्क्यांच्या बदल्यात फक्त 20 टक्के कमिशन मिळणार आहे. हा परिणाम हा लोकांच्या प्रीमियममधील रक्कम कमी होणार आहे. हा नवीन बदल सप्टेंबरच्या मध्यापासून लागू होणार असल्याचे संकेत आहेत.
5. पीएनबीमध्ये खाते असल्यास
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) याच्या ग्राहकांना 31 ऑगस्पटपर्यंत आपली केवायसी अपडेट करावी लागणार आहे. असे न केल्यास संबंधीत खातेधारकांचे खाते बंद होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बँकेने महिनाभर अगोदरच ग्राहकांना सुचना दिली होती.