बांदा / प्रतिनिधी
Tilari water entered in Insuli Canal; Joy among the villagers
तिलारीचे पाणी बांदा वाफोलिच्या पुढे येईल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना होता. त्यामुळे इन्सुली सह निगुडे, रोणापाल ग्रामस्थांनी आंदोलने करण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्यानंतर संबंधित विभागाला जाग आल्याने विलवडे येथे सुरू असलेले काम लवकरात लवकर आटोपून पाणी जलदगतीने सोडले. शनिवारी मध्यरात्री इन्सुलीत पाणी दाखल झाल्याने इन्सुली ग्रामस्थामधून समाधान व्यक्त होत आहे. तर सर्वच स्तरातून तिलारी पाठबंधारे विभागाचे कौतुक होत आहे.तर ग्रामपंचायत सदस्या सौ सोनाली मेस्त्री यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा मागे घेतला आहे.गतवर्षी ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर व सहकाऱ्यांनी विविध आंदोलने करून तिलारी विभागाला इन्सुली पर्यंत पाणी आणण्यास प्रशासनाला भाग पाडले होते.तर गतवर्षी इन्सुलीत पाणी आल्याने दरवर्षी होणारी पाणी टंचाई टळली होती. तर यंदाही पाणी येईल की नाही असा प्रश्न सर्वांना होता. अलीकडेच मार्च मध्ये विलवडे येथे साडे चारशे मीटर कालवा उखडून काढुन तो रिपेअर करण्याचे काम सुरू केले होते सदरचे काम पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन महिन्याची आवश्यकता होती तो पर्यंत उन्हाळा निघून जाणार होता. याबाबतची पाहणी केल्या नंतर इन्सुली ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली संतोष मेस्त्री यांनी पाणी येई पर्यत घागर घेऊन कालव्यात बसून बेमुदत मूक आंदोलन करणार असा इशारा दिला होता.
त्यानंतर संबंधित विभागाने खडबडून जागे होत वाफोलि येथे सुरू असलेल्या कामाला गती देत कालव्यातुन पाणी पुढे जण्याएवढे काम पूर्ण केले.व गोव्यात होणारा पाण्याचा विसर्ग कमी करून बांदा कालव्याला पाणी सोडले शनिवारी मध्यरात्री पाणी इन्सुलीत आल्याने ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली मेस्त्री यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले असून त्यांनी तिलारी विभागाचे इन्सुली गावाच्या वतीने आभार व्यक्त केले आहे तसेच शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्य तेवढाच करून शेती करावी असे आवाहन केले आहे. सदरचे पाणी निगुडे, रोणापाल पर्यंत जाणार असून त्याही भागातील सरपंच, माजी सरपंच यांनी दिलेल्या लढ्याला यश आले आहे.