प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई विद्यालयात नूतन विद्यार्थ्यांकरिता उपाकर्म विधी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. आसावरी संत उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत वेळ ही महत्त्वाची असल्यामुळे वेळेचे नियोजन करा. पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेऊन आपल्यामध्ये संयम राखला पाहिजे. आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू नये. सध्याचे युग हे स्पर्धात्मक असल्याने त्यादृष्टीने पाल्याला मार्गदर्शन करावे, असे मार्गदर्शन केले.
शाळेचे प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांनी पालकांना शाळेच्या ध्येयधोरणांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपपूजनाने झाली. तन्वी इनामदार हिने ईशस्तवन तर क्रांती विचारे हिने स्वागतगीत सादर केले. सर्वेश देसाई यांनी तबल्याची साथ दिली. संगीत शिक्षिका चंद्रज्योती देसाई यांनी गुरुवंदना सादर केली. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षिका सोनाली व अर्चना यांनी परिचय करून दिला. शिक्षिका प्रिता यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी शाळेचे संचालक गिरीधर रविशंकर, नितीन कपिलेश्वरकर, अनिल चौधरी, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रणीता वेर्णेकर, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.