कोल्हापूर ब्रेकिंग
कोल्हापूर : मुसळधार पाऊस, ओढ्याला आलेला पूर, आजूबाजूला घनदाट झाडी, त्यातून येणारे प्राण्यांचे आवाज…आणि मदतीसाठी आरडाओरड…अशी भयान परिस्थिती 17 पर्यटकांवर ओढावली होती. मदतीसाठी याचना करणाऱ्या त्या पर्यटकांना अखेर पहाटेच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानाने सुखरूप पणे दोरीच्या साह्याने बाहेर काढले. वर्षा पर्यटनासाठी किल्ले रांगणा येथे गेलेल्या 17 पर्यटकांच्यावर ही वेळ उडवली. अखेर तब्बल सहा तासाने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली
वर्षा पर्यटनासाठी भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे जिल्ह्यातील पर्यटन गेले होते. गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नाल्यांना पूर आला आहे. किल्ले रांगणा फिरून आल्यानंतर परतीच्या मार्गावर असणाऱ्या ताब्यांचीवाडी ओढ्याला पूर आल्याने हे 17 पर्यटक अडकले होते.
याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाले तसेच जिल्हा आपत्ती कक्षाला मिळाली. स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साह्याने पहाटेची सुमारास काहींची सुटका केली. तर पहाटेच्या पाचच्या सुमारास उर्वरित पर्यटकांची जिल्हा आपत्ती दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.