विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे युरोपला फटका बसला आहे. या युद्धात जगातील सर्व राष्ट्रांनी युक्रेनच्या बाजूने उभे रहावे, अशी युरोपातील मान्यवरांची इच्छा आहे. मात्र अशाच प्रकारचे संघर्ष भारताच्या शेजारी देशांनी भारताच्या विरोधात निर्माण केले आहेत. त्यांच्याकडेही युरोपियन देशांनी लक्ष दिले पाहिजे. युक्रेन युद्ध हा युरोपियन देशांसाठीही धडा आहे. त्यांनी यापासून योग्य बोध घ्यावा, असे आवाहन भारताचे विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांनी पेले.
‘रायसीना डायलॉग्ज’ या कार्यक्रमात ते विविध देशांच्या नेत्यांसह चर्चा करीत होते. त्यांना या देशांच्या नेत्यांनी युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेसंबंधी प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. युपेनच्या युद्धग्रस्त जनतेसंबंधी युरोपियन देशांना असलेला कळवळा योग्यच आहे. पण एक वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील जनतेला युरोपियन देशांनी वाऱयावर सोडून दिले होते, याचीही आठवण ठेवली जावी, असे त्यांनी नॉर्वेच्या विदेश मंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. आशिया खंडात असे मानवाधिकारांसंबंधीचे आव्हान नेहमी निर्माण होत असते. आमच्या भागात जेव्हा अशी आव्हाने निर्माण होतात तेव्हा आम्हाला ‘व्यापारावर भर द्या’ असा सल्ला युरोपियन देशांकडून दिला जातो. आता युपेनचे युद्ध हा युरोपला जागे करणारा एक इशारा आहे. त्याचा योग्य अर्थ समजून घ्यावा आणि आशियात काय चालले आहे ते आवश्य पहावे असे आवाहन त्यांनी केले.
दहशतवाद अद्यापही जागा
भारताच्या एका शेजारी देशात दहशतवाद अद्यापही जिवंत आणि कार्यरत आहे. त्याचा भारताला अनेकदा उपद्रव होतो. जेव्हा आशियात कायदाधारित देश आणि समाजासमोर अशी आव्हाने निर्माण होतात तेव्हा युरोपियन देशांनी त्याकडे कानाडोळा करु नये, अशी आमची सूचना आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.