आपण पदरचे पैसे किंवा वेळ किंवा किमान वेळतरी खर्च करून मैफिलींना जात असतो. शहरात अनेक कलाकारांच्या आणि असंख्य प्रकारच्या मैफिली दररोज असतातच. त्यामुळे संगीतप्रेमी जनांना आता संगीताचा व्यासंग आपापल्या परीने, वाटेने, मगदुराप्रमाणे आणि आपापल्या आवडीनुसार करणं खूप सोपं झालं आहे. छोटय़ा शहरात आणि खेडय़ापाडय़ात मात्र अशी रोज लाइव्ह मैफिलीत शरीक होण्याची पर्वणी वारंवार मिळत नाही. पण तिथेही हौशी आणि व्यावसायिक संगीत मंडळं असतातच. त्यातील काही शास्त्रीय संगीताला वाहिलेली असतात तर काही उपशास्त्रीय संगीताला वाहिलेली असतात. सुगम संगीतात काम करणारी सर्वात जास्त मंडळी असतात. विविध ग्रुप्स चढाओढीने कार्यक्रम ठेवत असतात. दर महिन्याला संगीत सभा भरविल्या जातात. जलसे होतात. स्थानिक रियाजी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ये÷ संगीतप्रेमी किंवा गुरु नक्कीच पुढाकार घेतात. याशिवाय विविध स्पर्धा होतात आणि लोकांना चांगलं गाणं ऐकायच्या संधी त्या स्पर्धांमधून उपलब्ध होतात. थोडक्मयात विविध प्रकारच्या मैफिली आपल्याला ऐकायला मिळत असतात. प्रत्येक मैफिलीचा हेतू वेगवेगळा असल्याने अर्थातच सादरीकरण त्याप्रमाणे बदलत असतं. नवीन कलाकार असतील तर ते व्हरायटी दाखवण्याची संधी दवडत नाहीत आणि त्यांच्या प्राविण्याची झलक दाखवण्याकडे अगदी स्वाभाविकपणे झुकतात. सुस्थापित कलाकार तब्येतीने सादरीकरण करताना दिसतात. त्यांच्या सादरीकरणात बऱयापैकी रिलॅक्स मूड असतो आणि पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी असणारी धडपड किंवा ज्याच्या त्याच्या हिशेबाप्रमाणे रियाजाचं प्रमाणही दिसून येतं. तर ज्ये÷ कलाकार गाण्यात एक विशिष्ट उंची गाठलेली असल्यानं की काय फार वेगळय़ा पद्धतीने व्यक्त होत असतात. गाण्यात आयुष्य घालविल्यामुळे त्यांच्या गाण्यात सहजभाव आणि सलगता सौंदर्यपूर्ण रीतीने जाणवते. माशाने पाण्यात डुबकी मारावी तितक्मयाच सहज येणारं ते गाणं असतं. पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या सगळय़ाच मैफिली आपल्याला सारख्याच आवडतात का? किंवा हरेक मैफिल संपूर्ण जमलेली जाणवते का? आयोजकांनाही सगळय़ा कार्यक्रमांच्या सादरीकरणानंतर सारखंच समाधान मिळतं का? आणि कोणत्याही कलाकाराला आपली मैफिल झाल्यावर दरवेळी आपलं गाणं जमलं असं वाटतं का?
याचा विचार केला तर तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर बहुधा ‘नाही’ असंच असेल. अमुक अमुक गायकाचं गाणं मी परवा अबक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ऐकलं होतं तेव्हा मला ते मुळीच आवडलं नव्हतं पण आता मित्राच्या आग्रहामुळे यावंच लागलं आणि आज जे ऐकलं ते अतिशय सुरस होतं. असा अनुभव येतो. याउलट पहिल्यांदा ऐकल्यावर खूप आवडलं म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला गेलो तर नंतर नंतर ते नीरस आणि कंटाळवाणं वाटायला लागलं असाही अनुभव येतो श्रोत्यांना! आयोजकांची तीच गत असते. एखाद्या नावाजलेल्या कलाकाराचं गाणं आयोजित करण्यासाठी जिवाचा आटापिटा करून त्याला आणलं जातं आणि मग पश्चात्ताप होतो. कारण तो कलाकार अपेक्षित पातळीला जाऊन गातच नाही. ऐकणाऱयांचा अर्थातच अपेक्षाभंग होतो आणि आयोजकांच्या वाटणीला घरचा आहेर येतो. तेव्हाचं त्यांचं दुःख त्यांनाच माहीत! अशा अनुभवातून शहाणे झालेले काही आयोजक रावसाहेब स्टाइलने असं सांगतात, की आम्ही तुमचं गाणं आधी ऐकू. मग लोकांना पसंत पडलं तर पुढच्या कार्यक्रमापासून तुम्हाला अपेक्षित ते मानधन आणि प्रसिद्धी दिली जाईल. ते गाणं अतिशय जमून जातं आणि मग ती व्यक्ती भराभर पुढे जाते. तिचं नाव होतं. तिसरी बाजू असते कलाकारांची. त्यांना तर बहुतेक वेळा स्वतःचं सादरीकरण पसंतच पडत नसतं. खरं तर ते चांगल्या कलाकाराचं लक्षण आहे. त्यामुळे बहुतांश वेळा त्यांच्या दृष्टीने त्यांची मैफिल खूपच वेळा मनासारखी जमतच नसते. आता परत प्रश्न असा पडतो की मग जर का बऱयाचदा मैफिल जमतच नसेल तर मुळात मैफिल जमून आलेली नाही असं केलेलं विधान खरं आहे का? असलंच समजा, तर कितपत खरं आहे? आणि खरं असेल तर न जमणाऱया गाण्यामागे काही कारणं आहेत का? जरा या प्रश्न उत्तर साखळी पद्धतीने विचार करायला लागलो तर काय होईल? एका उत्तरात अनेक प्रश्न निर्माण होतील. गाण्याची बैठकच काय पण न जमलेल्या प्रत्येक कामामागे कारणं ही असतातच. आणि त्याचा नीट विचार केला तर ती उमगतातही.
सर्वात पहिलं कारण म्हणजे कलाकारी आणि कलेचं सादरीकरण हा अमूर्त बुद्धिमत्तेचा भाग असतो. सर्जनशीलता ही काही घडय़ाळाच्या काटय़ावर जमू शकेल असं दरवेळी नसतं. कर कर करूनही काहीवेळा गाण्यात पुढे जाताच येत नाही. सुचत नाही, मनासारखं होत नाही. मग फक्त योग्य दिशेने प्रयत्न करीत राहणे हा एकच उपाय शिल्लक राहत असावा. तर काहीवेळा मनावर ताण असल्याने मैफिलीत मनासारखं सादरीकरण जमत नाही. तालमीत सोपी वाटणारी गोष्ट प्रत्यक्ष कार्यक्रमात चांगलाच चटका देऊन जाऊ शकते. अर्थात हे विधान सार्वत्रिक नव्हे. व्यक्ती तितक्मया प्रकृती असतात. काहीवेळा एका गोष्टीची तयारी केली जाते आणि प्रत्यक्षात वेगळंच काही सादर करायची वेळ येते. असं झाल्यास त्याचा कदाचित पुरेसा रियाज नसल्याने ते गाणं बिघडतं. काहीवेळा एखाद्या गायनप्रकाराचा पुरेसा रियाज, व्यासंग न करताच सादरीकरण करायला धावणारी काही मंडळींची वृत्ती असते. शास्त्रीय संगीतातील पूर्वसूरिंचं आणि आत्ताच्या ज्ये÷ांचंही म्हणणं हेच असतं, की शिकलेलं गाणं नीट पचल्याशिवाय नस्ते प्रयोग करायला जाऊ नये. पण ते जर सादरकर्त्यांनी मानलंच नाही तर त्याचा परिणाम मैफिल न जमणे, विस्कळित सादरीकरण होणे असाच होतो. तर काहीवेळा जिथे ते गाणं आयोजित केलं जातं ते वातावरण कसं आहे याचाही परिणाम होतो. कित्येकदा कार्यक्रम बंदिस्त सभागारात आयोजित केले जात नाहीत. उघडय़ा रंगमंचावर प्रयोग करणं हा वेगळा विषय असतो. त्यात श्रोत्यांची कुजबुज, आजूबाजूच्या परिसरातील अनेक अवांछित आवाज याला सामोरं जावं लागतं. त्याचा परिणाम गायक आणि श्रोते दोघांनाही भोगावा लागतो. साउंड सिस्टीम धड अवस्थेत मिळणे आणि प्रत्येकाचे माईक आवश्यक त्या फ्रिक्वेन्सीवर सेट होणे हे वेळखाऊ काम. कधीकधी आयोजक आणि कलाकारांचं वाजतं तर उट्टं कार्यक्रमावर निघतं.
एक सर्वसामान्य श्रोता म्हणून यावर बरंच काही बोलावंसं वाटतं. असा विचार येतो की सर्वांनीच काही पथ्य पाळली तर नाही का चालणार? ज्या गोष्टींचा पुरेसा रियाज झालेला नाही असं जर त्या कलाकाराला वाटत असेल तर त्याने तिचं सादरीकरण न करण्याचा किंवा थोडं अधिक परिष्करण करून सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला तर नाही का चालणार? थोडं थोडं येणारं सगळंच करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जे पक्केपणाने येतं तेच सादर करण्याचा निर्णय नाही का घेता येणार? तसंच काही गोष्टी या वेळेवर सोडून दिल्या तर त्यांच्यावर येणारा अनावश्यक ताण कमी होईल आणि मैफिल जमून येईल असं वाटतं. समोरच्या कलाकाराची परीक्षा घ्यायला आल्यासारखं बसणं टाळलं आणि मैफिलीची मजा घेता आली तर ती निश्चितच रंगतदार होईल. कडकडून येणारी टाळी आणि मुक्तकंठाने दिलेली दाद आपोआप कलाकारांना मूडमध्ये आणते. न जमलेल्या मैफिली मायनस करून जमणाऱया मैफिलींची संख्या वाढवता येईल. नाही का? -ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू