तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी।
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठा
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लष्टिसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।2।।
अर्थः- स्त्री-अभिलाषी परंतु आपल्या पत्नीपासून दुरावलेला व त्यामुळे सोन्याचे कडे गळून पडल्यामुळे भुंडे हात झालेला त्या यक्षाला, त्या रामगिरीवर काही महिने घालवल्यावर आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताच्या बाजूवर आपल्या सुळय़ांनी लीलेने ढुसण्या देताना खाली वाकलेल्या हत्ती प्रमाणे पाहण्यासारखा असलेला, पर्वत शिखराला बिलगलेला ढग त्याला दिसला.
रामगिरीवरील आश्रमात यक्ष आपला काळ अतिशय कष्टाने कंठत होता. आपल्या प्रिय पत्नीचा विरह झाल्याने त्याचे डोळे खोल गेले होते. मुख निस्तेज झाले होते. तो इतका कृश झाला होता की, त्याच्या हातातली सोन्याची कडी गळून पडू लागली. हिमालय आणि रामगिरी हे अंतर तर किती तरी दूर असणारे! तरीही निरुपायामुळे कसेबसे आठ महिने त्याने इतक्मया दूरवर काढले.
‘कनकवलय……’ हे पद घालण्याची आवश्यकता का भासली असावी ? तो यक्ष ‘कामी’ होता. कामी मनुष्याला जर प्रिय माणसाचा विरह झाला तर तो झुरणीस लागतो. यक्षालाही प्रिय पत्नीचा विरह झाल्यामुळे तो झुरणीला लागला होता. त्यामुळे त्याच्या हातातील वलय भ्रष्ट झाले होते.
पुढे पावसाळा जवळ येऊन ठेपला. आकाशात मेघ दिसू लागले. अशा वेळी यक्ष इकडे तिकडे फिरत असताना आषाढाच्या पहिल्याच दिवशी रामगिरीच्या शिखरावर टेकलेल्या एका मेघाकडे त्याचे लक्ष गेले. डोंगराच्या तटावर धडका देत असणाऱया हत्तीसारखा तो दिसत होता. यक्ष त्याच्याकडे कौतुकाने पहात होता. ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ ऐवजी ‘आषाढस्य प्रशमदिवसे’ असाही एक पाठभेद आहे. मल्लिनाथाने तो पाठ अनावश्यक असल्याची टीका केली आहे. तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोरन्तर्बाष्पश्चिरनुचरो राजराजस्य । मेघालोके भवति सुखिनोएप्यन्यथावृत्ति चेतः कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे।। 3। ।
अर्थ – ः कुबेराचा सेवक उत्कंठा वाढवणाऱया त्या मेघापुढे आपले अश्रू आवरून मोठय़ा कष्टाने उभा राहून बराच वेळ शांत राहिला. मेघ दृष्टीस पडल्यावर बायकामुलांत असलेल्या लोकांच्या चित्तवृत्तीदेखील क्षुब्ध होतात. मग गळय़ाला मिठी मारण्यासाठी उत्सुक असलेल्याला आपले माणूस दूर असल्यावर काय बरे होत असेल? पूर्वमेघाची सुरूवात अशा सुंदर श्लोकांनी झाली आहे. कालिदासाच्या भाषा सौंदर्याचा अधिक आस्वाद आपण पुढील अनेक श्लोकांतून घेणार आहोत.