राधानगरी, महेश तिरवडे
Radhanagari News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वोत्कृष्ट आगार अभियानात राधानगरी आगार राज्यात प्रथम क्रमांकावर आणायचा आहे.भौतिक सुविधा आणि आगाराचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी तालुक्यातील आणि तालुक्या बाहेरील दानशूर आणि एसटीवर प्रेम करणाऱ्या हजारो दानशूरांनी वस्तू,श्रम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बस स्थानक स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेतली आहे.
बस स्थानक स्वच्छ,सुंदर असेल त्या बस स्थानकांना प्रदेश आणि विभागनिहाय बक्षीस दिली जाणार आहेत.या अभियानात राधानगरी आगाराने सहभाग घेतला आहे. या पाश्वभूमीवर राधानगरी आगार व्यवस्थापनाने आगाराच्या मुख्य इमारतीत पत्रकार परिषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी आपली भूमिका मांडली या अभियानात राधानगरी आगार राज्यात प्रथम येण्यासाठी आपले प्रयत्न असून आगाराचा कायापालट करण्यासाठी उद्योजक, हितचिंतक आणि सर्व नागरिकांनी विविध स्वरूपात मदत करण्याचं आवाहन केले.
बसस्थानक रंगरंगोटी करणे,धरण व गव्याची प्रतिकृती तयार करणे, राऊतवाडी धबधबा, बेनझीर व्हीला व छ, शाहू महाराज यांची थीम तयार करणे,संरक्षण भिंतीवर स्लोगणं तयार करणे,आपले गाव आपले बसस्थानक यात लोकसहभाग वाढवणे, नवीन प्रसाधनगृह मागणी करणे, बसस्थानकाच्या आधुनिकीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करणे अशी प्रस्थाविक कामे आहेत यासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे होते.प्रवाशांना बस स्थानक आपले वाटावे आणि जास्तीतजास्त प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करावा, यासाठी महामंडळाने या अभियानांतर्गत बस स्थानकांसाठी तब्बल दोन कोटींची बक्षिसे ठेवली आहेत. यावेळी कार्यशाळा अधीक्षक स्नेहल पाटील,वाहतूक निरीक्षक पंकज पाटील,मच्छिंद्र ढोंगे,वरिष्ठ लिपिक साताप्पा काशीद गजानन कुंभार ,आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.