ज्यादा आजार असलेल्या जनावरांच्या उपचारासाठी खास पथकांकडून उपचार; जनावरांना वाचवण्यासाठी शेवटपर्यंत पशुसंवर्धन विभाग तत्पर
सातारा : प्रतिनिधी
लम्पी हा जनावरांना होणारा आजाराचे जिह्यात रोखण्याचे शिवधन्युष्य राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग काम करताना दिसतो आहे. गायवर्ग प्रकारातील सर्वच 3 लाख 47 हजार जनावंरांना लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लम्पी आजाराने 3 हजार 725 जनावरांना बाधा झाली होती. त्यापैकी 247 जनावरे लम्पी या आजाराने मृत्यू पावली. या आजारातून एकही जनावरं मृत्यू होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग अलर्ट झालेला असून जे जनावर जास्त आजारी आहे. त्या जनावरांवर उपचार करण्यासाठी खास पथके तैनात केली आहेत. त्या पथकाकडून उपचार करण्यात येत आहेत.
लम्पी हा आजार जनावरांमध्ये अलिकडच्या काही दिवसात होवू लागला. लम्पीच्या साथीमुळे गावागावातील जनावरांचे गोठेच्या गोठे गजबजून जावू लागले. जनावरांच्या अंगावर जखमासारखे दिसून येवू लागले. सुरुवातीला याकडे पशुपालकांनी दुर्लक्ष केले. परंतु पुन्हा जसे जनावरांचा या रोगामुळे मृत्यू होत आहे, असे समजताच त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे धाव घेतली. राज्याच्या पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्य्यमातून सर्वच जनावरे या रोगापासून वाचवण्यासाठी लसीकरण सुर केली. त्या लसीकरणामध्ये कोणतेही जनावर वंचित राहु नये यादृष्टीने पक्के नियोजन करुन तशा सुचना दिल्या होत्या. गावोगावी सर्वच पशुपालकांनी त्यास उत्तम असा प्रतिसाद दिला आणि लसीकरण करवून घेतले. आतापर्यंत 3 लाख 47 हजार जनावंरांना लसीकरण करण्यात येणार आहे. लम्पीने सातारा जिह्यात आज अखेर 3 हजार 725 जनावरे बाधित आहेत. त्यापैकी 247 जनांवराचा मृत्यू झाला आहे. बाधित जनावरांचा औषधोउपचार केला जात आहे. त्याच्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ज्या तालुक्यात लम्पीने जनावरे बाधित नाहीत त्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी असतील इतर कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मार्फत उपचार केले जात आहे. जे जास्त आजारी जनावरांवर उपचार सुरु आहे. त्यातील काही जनावर उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. काही जनावर मेडिसीन पशुवैद्यकीय अधिकाऱयांचे पथक पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. शिरवळ पशुवैद्यकीय मेडिकल कॉलेजची मदत घेतली जात आहे. लम्पी आजारावरील औषधोपचार आणि अशा करुयात लसीकरण संपलेली आहे. फलटण वगळता इतर सगळीकडे नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.