डाळी, कडधान्यांचे दर भडकले
बेळगाव/ प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल गॅस सिलिंडरपाठोपाठ आता भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता महागाईच्या कचाटय़ात सापडली आहे. विशेषतः पालेभाज्यांचे दर भडकल्याने भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेर गेला आहे. त्याचबरोबर डाळी आणि कडधान्यांचे दर भडकल्याने सर्वसामान्यांनी आता काय खावे? असा प्रश्न पडला आहे. गवार, मेथी, पालक, शेपू आदी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात ढबू 60 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, गवार 40 रु. किलो, बिन्स 60 किलो, टोमॅटो 25 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, ओली मिरची 80 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, कोबी 20 रु. एक, कारली 60 रु. किलो, फ्लॉवर 20 रु. किलो, मेथी 10 रु. एक पेंढी, पालक 10 रु. एक, 20 रुपयाला 3 पेंढय़ा, कांदापात 20 रु. पाच पेंढय़ा, शेपू 20रु. 3 पेंढय़ा असा दर आहे.
गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. त्याचबरोबर भाजीपाल्याची खरेदी केली. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसात भाजीपाल्याचा दर वाढल्याने सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. कडधान्य आणि डाळींच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने नागरिकांनी काय खावे? असा प्रश्न पडला आहे. शिवाय गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेशोत्सव काळात भक्तांना महागाईला तोंड देतच जगावे लागणार आहे.
गणेशोत्सवासाठी बाजारात नागरिकांची लगबग दिसून येत आहे. भाजीपाला खरेदीबरोबर किराणा बाजारासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. पावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. दरम्यान आवक घटल्याने भाजीपाला दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाजीपाला खरेदी करणे मुश्कील बनले आहे..