प्रतिनिधी /बेळगाव
बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स उभे करून वाहनांची तपासणी करण्यात आली. प्राणीहत्या रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शनिवारी रात्रीपासूनच पोलिसांची तपासणी सुरू होती.
ज्या परिसरात कत्तलखाने आहेत, त्या परिसरावर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. प्राणीहत्येसंदर्भात राज्य सरकारने कडक निर्बंध जारी करून कोणत्याही परिस्थितीत गाय, बैल आदी गोवंशाची हत्या करू नये, असे बजावले होते. स्थानिक पोलिसांनाही यासंबंधी सूचना दिली होती.हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही बेळगाव शहर व परिसरातील मांस वाहतूक करणाऱया वाहनांवर लक्ष ठेवले होते तसेच गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही याविषयीचे निवेदन देऊन प्राणी वाहतूक रोखण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर बॅरिकेड्स उभे करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.