पिळगाव, डिचोलीवर शोककळा. अनेक मान्यवरांसह डिचोली पत्रकार संघातर्फे शोक व्यक्त. 1 ऑक्टो. रोजी झाला होत चोडण येथे अपघात.
जेष्ट पत्रकार अनंत (संदेश) साळकर (पिळगाव डिचोली वय वर्षे 56) यांचे रवि. दि. 9 ऑक्टो. रोजी संध्या. 6.30 वा. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले.
गेल्या 1 ऑक्टो. रोजी त्यांना सडेती चोडण येथे अपघात झाला होता. रात्री काम संपवून पणजीहून पिळगाव डिचोलीच्या दिशेने येत असताना रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला रानडुक्कराने जोरदार धडक दिली होती. या धडकेने ते थेट रस्त्यावर फेकले गेले व त्यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी त्यांच्या डोक्मयातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यांना लागलीच बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले. रात्री तत्काळ त्यांच्या डोक्मयावर सुमारे सात तास शस्त्रक्रिया झाली.
या शस्त्रक्रियेनंतर त्यांना गोमेकॉच्या अतिदक्षता विभागात निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती मात्र गंभीरच व नाजूक होती. ती स्थिर करून जाग्यावर आणण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या उपचारादरम्यानच त्यांची काल रविवारी संध्याकाळी प्राणज्योत मालवली.
एक अतिशय अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. इंग्रजी, मराठी, कोंकणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. दै. तरुण भारत, लोकमत, गोमंतक, सुनापरांत आदी विविध वर्तमान पत्रातून त्यांनी उपसंपादक, संपादक, वृत्त संपादक, पुरवणी संपादक आधी विविध पदावर काम केले. एक उत्तम स्त?भ लेखक, प्रतिभावंत कवी अशी त्यांची अष्टपैलू ओळख होती. एक पत्रकार म्हणून ते एक उत्कृष्ट मार्गदर्शकही होते.
त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता परिवारात तसेच पिळगाव गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी आदी परिवार आहे. गावाच्या सामाजिक शैक्षणिक विकासात त्यांचे सतत योगदान असे. एक सुस्वभावी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते.
त्यांच्या निधनाबद्दल आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. शेखर साळकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, डॉ. चंद्रकांत शेटय़? , सुरेश वाळवे, राजेंद्र केरकर तसेच विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा देह गोमेकॉत दान करण्यात आला आहे. तसेच डिचोली पत्रकार संघातर्फे त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.
सांत्वनपर भेटीसाठी परिवार आज सोम. दि. 10 ऑक्टो. रोजी संध्या 4 वा. नंतर पिळगाव येथे उपस्थित असेल याची मित्रपरिवार नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असे कळवण्यात आले आहे.