कसबा बीड प्रतिनिधी
सडोली दुमाला तालुका करवीर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थांकडून तात्काळ सेवा वगळता एक दिवस संपूर्ण गाव बंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची सुरुवात हनुमान चौक सडोली दुमाला येथून करण्यात आली. सकाळी 9.30 वाजता गावातील सर्व तरुण मंडळे, सर्व संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, युवक, ग्रामस्थ एकत्रित येऊन गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी मराठी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे…. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे… नाही कोणाच्या बापाचे…. अशा घोषणा देत भव्य रॅली काढून मनोन जरांगे पाटीलने यांच्या आंदोलनात गावाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच अभिजित पाटील यांनी आरक्षण अभावी मराठा समाजातील तरुण सर्व सोयी सुविधा पासून वंचित आहे असे आपले मनोगतात सांगितले, सामा. कार्यकर्ते संतोष भोसले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे – पाटील यांनी जे आंदोलन केले व जी सभा घेतली, ती पाहली असता महाराष्ट्र सरकारची झोप उडाली आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे, सुधाकर केसरकर व आदीची मनोगते झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल कांबळे,संग्राम पाटील,बाबासो चव्हाण, भिमराव केसरकर, समीर पाटील, बापूसो देसाई ,युवराज पाटील, वीर पाटील, तुषार साळोखे, अशोक कांबळे , ग्राम पंचायत कर्मचारी अनिल कांबळे , सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.