गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
सिद्धगिरी पशु वंध्यत्व निवारण आणि कृत्रिम भ्रूण प्रत्यारोपण केंद्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे देशी गाय पाळणाऱ्या शेतकऱ्यांना होणारा त्रास या सेंटरमुळे थांबणार आहे. शिवाय भाकड गाई व कसाबाकडे जाणाऱ्या गाई सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे थांबणार आहेत. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. हे सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करत असून जास्तीत जास्त उपक्रम शेतकरी फायद्याचे राबवत आहे. या केंद्रातून दिवसाला शंभर गाईंचे बीजारोपण होणारे सेंटर असून देशातील हे नामवंत सेंटर म्हणून याचे नाव होईल असे त्यांनी यावेळी सांगितले .
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी स्वामीजी बोलताना म्हणाले देशी गाईचे संगोपन वाढले तर दुधाचा होणारा तुटवडा हा कमी होऊन दूध वाढीस मोठा फायदा होणार आहे. शिवाय देशी गाई कत्तलखान्यात जाणाऱ्या थांबणार असुन ज्या गाईंना बिजारोपणाची आवश्यकता आहे त्या सर्व गाईंचे बीजारोपण कणेरी मठावर आयव्हीएफ सेंटर मध्ये केले जाणार आहे. यामध्ये भाकड गाईंचा सुद्धा समावेश असणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.