विरोधकांनी सुरुवातीपासूनच राजाराम कारखान्याविषयी अपप्रचार सुरू केला होता. त्यांच्या अपप्रचारामुळे सभासद वर्ग दुखावला गेला होता. त्यामुळे विरोधकांवरचा आपला राग ते मताद्वारे व्यक्त करतील याची खात्री माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “122 गावांमध्ये राजर्षी शाहू सहकार आघाडीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही 25 दिवसात विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर विरोधक देऊ शकले नाहीत, इथेच त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे निश्चितच पंचवीस तारखेला राजर्षी शाहू सहकार आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, याचा विश्वास आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये पुन्हा एकदा सहकाराचाच विजय होईल !” असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला.