बेळगाव प्रतिनिधी – सह्याद्रीनगर, सारथीनगर, पोलीस कॉलनी, डी ग्रुप कॉलनी, आणि आश्रय कॉलनी येथे दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा बॉक्साईट रोड येथे रस्ता रोको करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या सर्व परिसराला पाणी नसल्यामुळे टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. या पाण्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा एल अँड टी या पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे अखेरचे निवेदन असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. महसूल अधिकारी एस. एम. बरगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव हट्टी, एस. एस. नागणूर बी.आर. ढाबळे, स्वामी हिरेमठ, आरिफ खान, एम. डी कलशेट्टी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
Trending
- ‘खोक्या‘साठी तत्त्व सोडणारी ही मंडळी कसला विकास करणार- विजय देवणे यांचा सवाल
- राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, विचारांचा मी वारसदार; शाहू महाराज यांची भूमिका
- संविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा : राजेश क्षीरसागर
- विकासात्मक नेतृत्व धैर्यशील माने यांना निवडून देऊया ; माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन
- ताळगांव ग्रामपंचायतीसाठी 68.79 टक्के मतदान
- खाणबंदीचे कारस्थान कोणी रचले?
- फालेरो, सार्दिन, चर्चिल निवडणुकीपासून दूरच
- विश्वजित यांनी केले तनुजाचे कन्यादान