आज अर्जांची छाननी, शेवटच्या दिवशी गर्दी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटच्या दिवशी वाळपई मामलेदार कार्यालयामध्ये मोठी गर्दी पहावयास मिळाली. अनेक उमेदवारांनी आपल्या परस्पर उमेदवारांना उमेदवारी भरण्यापासून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला??. आता मंगळवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाल्यानंतर बुधवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
सत्तरी तालुक्मयातील बारा ग्रामपंचायत निवडणुकीच्या 97 प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान काही प्रभागांमध्ये फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. मंगळवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार असून हे एकमेव अर्ज ग्राह्य झाल्यास काही ठिकाणी बिनविरोध निवड होण्याची शक्मयता आहे.
बुधवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून तो उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी मोठय़ा प्रमाणात राजकीय गणिते मांडण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते. अनेकांनी सेंटीग लावण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्या परस्परांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव येत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
दरम्यान दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये अनेक माजी पंच व सरपंचांचा समावेश आहे. काही उमेदवार तिसऱयांदा आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. मतदार त्यांच्या या प्रवाहाला कितपत प्रतिसाद देतात हे येणारा काळ ठरविणार आहे.