ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जातीय जनगणनेपासून लक्ष हटवण्यासाठी भाजपने महिला आरक्षण विधेयक आणलं आणि ते मंजूरही केलं. हे विधेयक लागू होण्यासाठी 10 वर्षही लागू शकतील. एवढंच काय, ते विधेयक लागू होईल की नाही, हे देखील माहीत नाही. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न आहेत, अशा शब्दात काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के जागा दिल्या जाऊ शकतात. पण सरकारला तसं करायचं नाही. सरकारनं विधेयक मंजूर केलं आहे, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 10 वर्षांनी होणार आहे. एवढंच नाहीतर, ते होणार की नाही हे देखील माहीत नाही. सरकारला जातीय जनगणनेवरून लक्ष हटवायचे आहे. त्यामुळे त्यांनी महिला आरक्षण विधेयक आणले. ते मंजूरही केले. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी 10 वर्ष लागतील, किंबहुना ते लागू होईल की, नाही हे देखील माहित नाही.
या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी जनगणना आणि सीमांकनाची गरज नसून हे विधेयक तातडीने लागू करण्यात यावे, असेही राहुल गांधी म्हणाले.