ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पृथ्वीच्या संरक्षण आणि सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दर वर्षी ‘अर्थ अवर’ म्हणून साजरा करण्यात येतो. आजही रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील लोक लाईट बंद करून हा ‘अर्थ अवर’ डे साजरा करणार आहेत.
पर्यावरण समस्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, तसेच पृथ्वीच्या सरंक्षणासाठी एकतेचा संदेश देणे हा ‘अर्थ अवर’ साजरा करण्यामागचा मूळ उद्देश आहे.
‘अर्थ अवर’ डे साजरा करण्यासाठी जगभरातील अनेक ऐतिहासिक इमारतींची लाईट बंद केली जाते. यामध्ये दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर, न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, आणि अथेन्समधील अॅक्रोपोलिस अशा 24 जगप्रसिद्ध वास्तूंचा समावेश आहे. भारतातील अर्थ अवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईट बंद केली जाते. 2010 मध्ये भारतातील 128 शहरांतील 70 लाखांहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला होता.