वाळपई काँग्रेस गट समितीचा आरोप
वाळपई / प्रतिनिधी
आयटीआय प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव निषेधार्थ आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत व हा प्रकल्प ताबडतोब इतरत्र स्थलांतरीत करावा अशा प्रकारची मागणी वाळपई काँग्रेस गट समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. वाळपई काँग्रेस कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर सेवादलाचे अध्यक्ष कृष्णा नेने व इतरांची खास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर यांनी सांगितले की गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पाच्या विरोधात शेळ मेळावली व सत्तरी तालुक्मयातील अनेक नागरिक प्रखरपणे आंदोलन करीत आहेत. यामध्ये गोवा राज्याच्या वेगवेगळय़ा भागातील नागरिक व समाजसेवी संघटनाचा समावेश आहे.
याप्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणारी प्रतिकूल परिस्थिती यामुळे हा प्रकल्प रद्दबादल करावा अशा प्रकारची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र सरकारची यंत्रणा हा प्रकल्प याच भागामध्ये होणार अशा प्रकारचा अट्टाहास करत असून यामुळे येणाऱया काळात सत्तरीवासियांना पर्यावरणाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे .त्याचप्रमाणे याभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या काजू लागवड व बागायती यांच्यासमोर गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प त्वरित रद्द बदल करावा अशा प्रकारची मागणी नंदकुमार कोपर्डेकर यांनी केली.
यावेळी बोलताना कृष्णा नेने यांनी सांगितले की बुधवारी मोठय़ा प्रमाणात शेळ मेळावली भागांमध्ये पोलीस व आंदोलक यांच्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहे. सदर गुन्हे त्वरित सरकारने मागे घ्यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. सरकारला बहुजन समाजाचे काही पडलेले नाही. बहुजन समाजाच्या विरोधात जाऊन सरकार जर हा प्रकल्प जनतेच्या माथ्यावर थोपविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते दुर्दैवी आहे. यामुळे सत्तेच्या मोहपाशात अडकलेल्या भाजपा सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा हीच जनता त्यांना कधी रस्त्यावर आणील हे सांगता येत नाही. यामुळे सरकारने बहुजन समाजाच्या वाटेवर जाऊ नये अशा प्रकारचे विनंती नेने यांनी केली आहे .यावेळी उपस्थित असलेल्या इतर पदाधिकाऱयांनी सरकारच्या दहशतीचा तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये सक्रियपणे उतरलेला आहे. येणाऱया काळातही या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाच्या सक्रियपणे सहभाग राहणार असून सरकारने कितीही खटाटोप केला तरीसुद्धा हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले असून त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील अशाप्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे.