वार्ताहर / उचगाव
बेळगाव तालुक्मयामध्ये सध्या ग्राम पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पश्चिम भागामध्ये साखर कारखान्यांना ऊस पाठविण्यासाठी उसाची तोड वेळेत होण्यासाठी आणि खरीप बटाटा बियाणांची लागवड वेळेत होण्यासाठी शेतकऱयांची धडपड चालू असून त्यांना त्यांची चिंता भेडसावत आहे तर उमेदवारांना निवडून येण्याची काळजी लागली आहे.
शेतकऱयांना पिकाची चिंता तर उमेदवारांना निवडून येण्याची चिंता या दुहेरी संकटात सध्या तालुका आहे. सध्याचे ढगाळ वातावरण, जमिनीची म्हणावी तशी न झालेली मशागत, लागवडीला मजुरांचा तुटवडा या सर्वच कारणाने यावषीच्या खरीप हंगामातील बटाटा, भाजीपाला लागवडीवर परिणाम झाल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. परिणामी शेतीकामामुळे निवडणुकीला गौण स्थान दिल्याचे चित्र आहे. सकाळ-संध्याकाळ उमेदवार आपल्या मोजक्मयाच कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतानाचे चित्र आहे. मतांची याचना पुन्हा पुन्हा उमेदवार करत असून एकदा निवडून आलो की मग पाच वर्षे कसलीच चिंता नाही, या विचारात उमेदवार आहेत.
भातकापणी, मळणी ही कामे शेतकरीवर्गाने जवळपास आटोपली आहेत. सध्या भाजीपाला, मिरची, बटाटा, उसाची पुन्हा लागवड करण्याच्या कामाच्या नियोजनात शेतकरी तर उमेदवार कोणाचे मत कोणाला? तुला-मला की तिसऱयाला या अंदाजचक्रात अडकल्याचे दिसून येत आहे. नेतेमंडळी, गावपातळीवरील वेगवेगळय़ा पक्षांचे पुढारी गावात फेरफटका मारत व दूरध्वनीद्वारे प्रचार करताना दिसत आहेत. ग्राम पंचायतीवर आपलीच सत्ता आली पाहिजे. तरच वरि÷ खुष, यासाठी आता नेतेमंडळींची हालचाल सुरू झाली आहे. एकंदरीत प्रचाराला हळुहळू वेग येत आहे.