धुळे/प्रतिनिधी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं असून ओबीसी आरक्षणासाठी (obc reservation) सर्वपक्षीय नेते (all party leaders) एकवटले आहेत. सर्वपक्षीय नेते ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर ठाम असून राज्यात होणाऱ्या आगामी निवडणूक या ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतरच घ्या असा त्यांनी आग्रह धरला आहे. दरम्यान, आज धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोतय. यापुढेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे. हा लढा निकराने लढायचा आहे, असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सांगितलं.
धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची (akhil bhartiya mahatma phule samata parishad) आढावा बैठक पार पडली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. पुढे बोलताना भुजबळांनी सध्याचा काळ हा ओबीसींच्या संक्रमणाचा, परीक्षा घेणारा काळ आहे. मात्र आपल्याला त्यावर मात करत पुढे जावे लागणार आहे. सामाजिक न्यायासाठी संघटनेची आवश्यकता होती. त्या आधारावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली. गोरगरिबांचं दुःख कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून काम करायचं आहे. ओबीसींची लढाई ज्यांनी ज्यांनी हाती घेतली त्यांना त्रास देण्याचे काम केलं. देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. त्यामुळे त्रास हा होणारच आहे. त्यामुळे घाबरून चालणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.