कोल्हापूर / प्रतिनिधी
कळंबा कारागृहात फेकण्यात आलेल्या दहा मोबाईल ,गांजा, चार्जर या प्रकरणाची दखल कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेली आहे. ते मोबाईल कोल्हापूर जिल्ह्यातील एका टोळीसाठी असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आलेली होती. या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी येरवडा येथे बदली करण्यात आलेली आहे. तर शेळके यांच्या ठिकाणी येरवडा कारागृहाचे चंद्रमनी इंदुरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चंद्रमनी इंदुरकर यांनी शुक्रवारी सकाळी सूत्रे हाती घेतली, अशी माहिती कारागृह अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.