प्रतिनिधी/सांगली
पावसाची संततधार कायम असल्याने धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे अलमट्टी धरणातून एक लाख 33 हजार.क्युसेस विसर्ग सुरु आहे. तर, कोयना धरणातून सकाळी 11 पासून 2100 क्युसेस विसर्ग सुरु करण्यात आला आहे.तो दुपारी 5800 क्युसेस पर्यंत वाढवला जाणार आहे. यामुळे नदी काठच्या गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाबळेश्वर व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरात सुरु आहे. सांगलीत आयर्विन पूलाजवळ कृष्णेची पाणीपातळी 13 फूट आहे ती वाढणार आहे. उपलब्ध माहिती नूसार आलमट्टीत 113 टिएमसी पाणी संचय झाला असून कोयनेत 82 टिएमसी पाणी साठा आहे.