प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्याती खेड ग्रामपंचायत दिव्यांग (अपंग) राखिव ३ टक्के व ५ टक्के निधीत मोठ्या भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामविकास विभागाने दिव्यांगासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्व उत्पनातुन ५ टक्के निधी दिव्यांग घटकासाठी राखीव ठेवणे व त्यासाठीच खर्च करणे बंधनकारक असताना ग्रामपंचात खेडच्या ग्रामविकास आधिकाऱ्यांनी बोगस लाभार्थी दाखवुन सन २०१५/०१६ ते २०१९/०२० मध्ये २० ते २५ लाख रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचे दिसुन येत आहे. प्रहार सातारा तालुका अध्यक्ष यांनी माहिती आधिकारातुन मिळवलेल्या माहितीवरून हा भ्रष्टाचार निदर्शनास आला आहे.
ग्रामविकास आधिकारी श्री गायकवाड हे सन २०१६ पासुन खेड येते आजपर्यंत कार्यरत आहेत. यांच्याच कालावधीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. संबधित आधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून सदर रक्कम वसुल करून ती दिव्यांगाना तात्काळ वाटप करावी तसेच सदर निधी नियमा प्रमाणे खर्च केला नाही आणि भ्रष्टाचार केला त्याबदल ग्रामविकास आधिकारी गायकवाड याच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद, सातारा यांना निवेदना द्वारे केली आहे. यावेळी प्रहारचे पदाधिकारी गौरव जाधव, विजय मोरे, अमोल कारंडे, आनंदा पोतेकर, अजय पवार, सौरव जाधव, शैल्द्र बोर्डे, अक्षय बाबर व खेड गावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
ग्रामविकास आधिकारी व सबंधित वरिष्ट आधिकारी यांच्यावर ३० दिवसाच्या आत कार्यवाही झाली नाहीतर आमरण उपोषणाचा इशारा प्रहारच्यावतिने दिला आहे. या निवेदणाची प्रत मा मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना पाठवण्यात आल्या आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करत, गलेलठ्ठ पगार असुन काम चुकार आहेत. तरी ही अधिकारी समाज्यातील वंचित घटकाचे न्याय काम असताना ते चुकिच्या पद्धतीने काम करत आहेत. दिव्यांग बांधव यांचा सध्दा 5 टक्के निधी खर्च करताना ते हलगर्जीपणा करतात त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली कि बाकी सर्व ग्रामसेवक हे व्यवस्थित काम करताना पाहायला मिळतील. राज्यामध्ये असे कारवाई होणे गरजेचे आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.