सरकारसोबत चर्चा सुरु : कंपन्यांकडून आले प्रस्ताव
नवी दिल्ली :
कोरोनाचा कहर हा आगामी काळातील विविध क्षेत्रांवर परिणाम करणारा ठरणारा असून यात उद्योग क्षेत्र सर्वात जास्त प्रभावीत होण्याचा अंदाज जागतिक पातळीवरील तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठे उत्पादनाचे केंद्र म्हणून आपली वाटचाल करण्याच्या उद्देशाने काम करणाऱया चीनसाठी आगामी काळात मात्र धोक्मयाची घंटा असल्याचेही तज्ञांकडून बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून हजारो कंपन्या भारतात दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात कंपन्यांची सरकारसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती पुढे येत आहे. यात जवळपास 100 विदेशी कंपन्यांचा समावेश आहे.
भारतात आगामी काळात लवकरात लवकर संबंधीत कंपन्या आपले स्थान बळकट करण्याच्या तयारीत असतील. कमीत कमी 300 कंपन्यांमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल उपकरणे, टेक्स्टाइल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स या क्षेत्रांतल्या कंपन्या उत्सुक असतील. यासाठी संबंधीत कंपन्यांना सरकार पूर्ण क्षमतेने सहकार्य करण्याची शक्मयता आहे. ही चर्चा सकारात्मकपणे पार पडल्यास चीनमधील उद्योग क्षेत्राला मोठा झटका बसेल असेही तज्ञ मत मांडत आहेत.
सरकारकडे प्रस्ताव
सदर कंपन्यांनी भारतात आपले उत्पादनांचे केंद्र स्थापन करण्यासाठी इच्छा व्यक्त केली असून सरकारी स्तरावरून आपला प्रस्ताव दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. यात विदेशातील भारतीय दूतावास तसेच राज्यांच्या उद्योगमंत्रालयाचाही समावेश आहे. त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार 1000 कंपन्या विविध टप्प्यावर गुंतवणूक करण्याची शक्मयता सांगितली जात आहे.