शेतकऱयांचीकृषीउत्पन्नसमितीकडेमागणी
प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वरातील जनावरांची बाजारपेठ सुरू करावी. या मागणीचे निवेदन शेतकऱयांसह व्यापाऱयांनी समितीचे सचिव बी. एस. रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केले आहे. सदर निवेदन जिल्हा कृषी विभागाकडे पाठवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रेड्डी यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकेश्वरातील जनावरांची बाजारपेठ गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे जनावर बाजारपेठ ओस पडली आहे. जनावरांची बाजारपेठ पुन्हा खुली करावी, अशा मागणीचे निवेदन बुधवारी शेतकऱयांनी समितीकडे दिले आहे. शहरातील सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असताना बाजारपेठ खुली करण्यात कोणतीच अडचण येणार नाही. तेंव्हा शुक्रवार 12 पासून जनावर बाजार भरविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी एपीएमसी माजी अध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरे, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, कुमार बस्तवाडी, रामा काकोळी, प्रवीण बस्तवाडी, अर्जुन मरण्णावर, आप्पासाहेब मुल्लानी, काडेश बस्तवाडी, गणपती माळी, प्रशांत हंजानहट्टी, आप्पासाहेब बस्तवाडी, मारुती काकोळी उपस्थित होते.