ऑनलाईन टीम/तरुण भारत
दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरूच आहे. बहुतेक भागांमध्ये पूर आला आहे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या दक्षिण भारतात 63 टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. तर, 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुर्ण भारतात 143.4 टक्के अधिक पावसाची नोंद झाली.
नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारताला अनेक वेळा मुसळधार पावसाचा सामना करावा लागला आहे. मात्र, यावेळी अनेक भागात पुराचा कहरही पाहायला मिळाला. भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना जारी करण्यात आली आहे. आणि रेड अलर्ट जारी केला आहे.