जीवनात वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रक केले की आपण जीवनात कधीच अपयशी होणार नाही. मात्र एक गोष्ट नक्की की ध्येय गाठण्यासाठी ध्येय उराशी बाळगणं तितकंच महत्त्वाचं…
आजच्या अत्यंत व्यग्र जीवनशैलीत वेळेचे व्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे उरकता येतात. अत्यंत घाईगर्दीच्या वेळेस अचानक उद्भवलेली महत्त्वपूर्ण कामे वेळेत पूर्ण करता येतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवणे शक्मय होते.
उत्पादनक्षमता वाढवता येते.
मनावरच्या ताणाची पातळी कमी करता येते.
कार्यालयीन कामे आणि व्यक्तिगत आयुष्यात पार पाडायच्या गोष्टी यांचा समतोल साधता येणे शक्मय होते.
वर्षाचे दिवस, दिवसांचे तास, तासातील सेकंद… हा सारा वेळ लहान-थोर, गरीब-श्रीमंत अशा साऱयांच्या वाटय़ाला सारखाच येतो. असं असून एखाद्याजवळ प्रचंड वेळ असतो. डोंगराएवढी कामं तो उभी करतो. एकाच वेळी वेगवेगळय़ा प्रकारच्या जबाबदाऱया लीलया पार पाडतो. तर काहींना कशासाठीच वेळ नसतो. अभ्यासाला वेळ नाही. घरच्यांशी बोलायला वेळ नाही. छंद जोपासायला वेळ नाही. याचं कारण एकच वेळेचं व्यवस्थापन त्यानं नीट केलेलं नसतं. असं व्यवस्थापन करणं म्हणजेच आपण उठणार कधी, झोपणार कधी आणि जागेपणी कोणकोणत्या गोष्टी, किती वेळ करणार याचा आराखडा तयार करणं. प्रत्येकाचा आराखडा वेगळा असतो. हाती असलेल्या 24 तासांपैकी तुम्ही अभ्यासाला, विश्रांतीला, वैयक्तिक कामांना, करमणूक, छंद इत्यादींना किती वेळ देणार हे ठोस ठरवायला हवं. यापैकी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते.
साधारणपणे असं म्हटलं जातं की, पहाटे वाचन, पाठांतर करावं आणि रात्री लिखाणाचा अभ्यास करावा वगैरे वगैरे. फक्त बदललेल्या जीवनशैलीत या साऱया जुन्या गोष्टी तंतोतंत पाळता येतातच असं नाही. पण प्रयत्न करायला हवा. ‘अभ्यास करणार’ असं नुसतं मोघम ठरवून चालत नाही. तर अभ्यास करणार म्हणजे नेमकं काय करणार- वाचणार, लिहिणार, पाठ करणार, प्रोजेक्ट पूर्ण करणार याचं निश्चित नियोजन केलेलं असावं.
योजना आणि आखणी
विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन जर तुम्ही जी कामे उरकायची आहेत ती योजनाबद्धरीतीने पार पाडलीत तर तुमच्या वेळेचा निश्चितच सदुपयोग होतो. विचार न करता आखलेला प्लॅन फिसकटण्याची शक्मयताच अधिक असते. कोणत्याही गोष्टीची आखणी करताना विविध शक्मयता लक्षात घेऊन ती केली तर गोंधळ उडण्याची शक्मयता कमी असते.
उद्दिष्ट महत्त्वाचे
तुमच्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असावं. त्यामुळे तुमच्या कामाला आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही जो वेळ देता त्याला एक दिशा प्राप्त होते. मात्र हे उद्दिष्ट सुरुवातीलाच निश्चित करावे. ते कसे, कधी आणि कितपत पूर्ण करता येईल, याचा आडाखाही आखलेला असावा. ते उद्दिष्ट तुम्हाला झेपेल असे असावे.
अग्रक्रम ठरवणे
जेव्हा ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता ते समजून घेतल्यानंतर तुमचे अग्रक्रम तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला लाभदायक ठरतील अशा गोष्टींना आधी वेळ देणं हे महत्त्वपूर्ण ठरतं.
कामांची यादी बनवणं दिवसभरात कोणकोणती कामं करायची याची आखणी मनाशी करायला हवी. कामाची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल. त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येईल. या दोन्ही पद्धतींचा उपयोग गरज भासेल त्याप्रमाणेही करता येणं शक्मय आहे. त्यामुळे कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक काम उरकणं शक्मय होतं.