आम्ही तो परत कधी मिळवत आहोत ?
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
पेगॅसस प्रकरणावरून बरेच दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेराव घातला आहे. यामुळे वातावरण चांगलच तापवले आहे. आता भारत चीन सीमावादावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारला पुन्हा घेराव घातला आहे. भारत आणि चीनमध्ये १२ वी लष्करी बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींसह त्यांच्या साथीदारांनी हजारो किलोमीटर भूप्रदेश चीनला दिला आहे. तो परत कधी मिळवत आहोत ? असा सवाल करत याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.
भारत आणि चीनमध्ये १२ वी लष्करी बैठक पार पडली. या चर्चेत लडाखच्या पूर्वेकडील सीमेवर असलेल्या हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि डेप्सांग या तीन पॉईंटमध्ये दोन पॉईंटवरून मागे हटण्याची तयारी चीनने दर्शवली आहे. ही बैठक 12 तास चालली होती. या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे.