बेकायदेशीर चिरे वाहतूकीमुळे नागरिकांच्या जिवाला धोका
वाळपई / प्रतिनिधी
पाटवळ सत्तरी येथे चिरेवाहू ट्रक व दुचाकी यांच्यादरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला .हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला .या भागांमध्ये बेकायदेशीर चिरे वाहतूक होत असून चिरे उत्खननाचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीमुळे या भागातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून या भागातील चिरेखाणी त्वरित बंद कराव्यात अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाटवळ याठिकाणी चिरेवाहतूक ट जात होता त्याच वेळी समोरून येणाऱया दुचाकी गाडीला त्यांनी जबरदस्त धक्का दिला. यावेळी गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकाने बाजूस असलेल्या एका झाडावर जोरदार धक्का दिला. यावेळी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांची ओळख पटलेली नाही. यासंदर्भाची माहिती मिळताच भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. तर ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले आहे. नागरिकांच्या माहितीनुसार ट्रक चालक पूर्णपणे मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे उघडकीस आलेली आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला आहे .
पाटवळ भागामध्ये मोठय़ा प्रमाणात चिरेखाणीचा व्यवसाय सुरू आहे. या भागातून दिवस व रात्र मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावरून मुले शाळेला जात असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेले आहे. याबाबतची माहिती अनेक वेळा स्थानिक पोलिस यंत्रणेला देऊन सुद्धा त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान सदर अपघात घडल्यानंतर या संदर्भाची माहिती देण्यासाठी वाळपई पोलीस स्थानकावर अनेक वेळा फोन करून सुध्दा स्थानकावरील फोन कोणीच उचलत नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. शेवटी निरीक्षक सागर एकोस्कर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बऱयाच उशिरा पोलिस यंत्रणा सदर ठिकाणी दाखल झाली। यासंदर्भात पंचानामा व पुढील प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे.