ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 लाखाचा टप्पा ओलांडला आहे.मागील 24 तासात देशात 69 हजार 239 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 912 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 लाख 44 हजार 941 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 56 हजार 706 एवढी आहे.
सध्या देशात 07 लाख 07 हजार 668 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 22 लाख 80 हजार 567 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 3 कोटी 52 लाख 92 हजार 220 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 01 हजार 147 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.