ऑनलाईन टीम / मुंबई :
महावसुली आणि भ्रष्टाचारी असलेले राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करा, असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नड्डा यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
राऊत म्हणाले, एखादं सरकार लोकशाही मार्गाने हटविण्याचा अधिकार दुसऱया पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर त्याच्या आधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने घुसखोरी करुन वसवलेले गाव उखडून फेकले पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी वाढले आहेत त्यांना उघडून फेकले पाहिजे. अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून दशतवाद्यांना उखडून झाले की मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुणही भाजपला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात यश आले नाही. त्यामुळे वैफल्य येणे स्वाभाविक आहे. त्यांची भूमिका मी समजू शकतो, असेही राऊत म्हणाले.