नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यात (एप्रिल आणि मे) देशातील प्रमुख 12 बंदरांमधील मालांची उलाढाल 22 टक्क्यांनी घसरुन 9.282 कोटी टनावर राहिली आहे. इंडियन पोर्ट्स असोसिएशन(आयपीए) यांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी समान कालावधीत याच बंदरांमधून जवळपास 11.923 कोटी टन मालांची उलाढाल झालेली आहे. यामध्ये प्रमुख बंदारांपैकी चेन्नई, कोच्ची आणि कामराजार बंदारांमधील उलाढाल तर 40 टक्क्मयांपेक्षा अधिक घसरली आहे.
प्रमुख बंदरापैकी कोलकता आणि जेएनपीटीवरील मालाची देवाण घेवाण 30 टक्क्मयांपेक्षा अधिक घसरली आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणामध्ये दिनदयाळ(जुने नाव कांडला), मुंबई, जेनपीटी, मार्मागोवा, न्यू मंगळूर, कोच्ची, चेन्नई, कामराजार (एन्नोर), वीओ चिदंबरम, विशाखापट्टणम, पारादीप आणि कोलकाता (हल्दिया) आदी बंदरांचा समावेश आहे. मागील व्यापारी वर्षात याच बंदरांमधून 70.5 कोटी टन मालाची उलाढाल झाली आहे.
कंटेनर व्यापार प्रभावीत
कंटेनर व्यापारावर लॉकडाऊनमुळे मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला. कंटेनर व्यापार 36.33 टक्क्मयांनी घटला आहे तर थर्मल कोळसा क्यापारात 35.94 टक्क्मयांनी घसरण झाली असल्याची माहिती ट्वेंटी फुट इक्विवेलंट युनिटच्या (टीईयू) संदर्भातून सांगण्यात आली आहे.