विधान परिषदेत भाजपने पाचही जागा जिंकल्या
प्रतिनिधी/ मुंबई
राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही चमत्कार करत भाजपने पाचही जागांवर विजय मिळविला. दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरस होती. मात्र लाड आणि जगताप हे निवडून आले असून काँग्रेसचे चंदकांत हांडोरे यांचा पराभव झाला. तर भाजपचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रसाद लाड तसेच शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीकडे 51 मते असताना त्यांना 57 मते मिळाली. त्यामुळे त्यांनी अधिकच्या मतांची बेगमी करून ठेवली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी 20 रोजी मतदान झाले. होऊन सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होण्याची अपेक्षा असतानाच काँगेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदान पद्धतीवर आक्षेप घेतला. त्यामुळे नियोजित वेळेनुसार पाच वाजता सुरू होणारी मतमोजणी लांबली. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळल्यानंतर त्यांनी पेंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीची पुनरावफत्ती झाली. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. एक जागा निश्चित निवडून येण्याची शक्यता असलेल्या काँग्रेसने त्यांचा दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने या निवडणुकीत चुरस वाढली होती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार होता. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही विजयाचे दावे केले जात होते, त्यामुळे अकारावा कोण? याचीच चर्चा अधिक होती.
मिळालेली मते ः भाजप प्रविण दरेकर 29, श्रीकांत भारतीय 30, राम शिंदे 30, उमा खापरे 27, प्रसाद लाड 17, शिवसेना ः साचीन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीकडे 51 मते असताना त्यांना 57 मते मिळाली. त्यामुळे त्यांनी अधिकच्या मतांची बेगमी करून ठेवली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले.
महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाटय़ावर
महाविकास आघाडीची 21 मते फुटली असुन शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटलेली असताना मात्र राष्ट्रवादीला त्यांच्या मतांपेक्षा अतिरीक्त मते पडली असुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाटय़ावर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत 288 आमदारांपैकी 285 आमदारांनी मतदान केले. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत असल्याने सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना मतदानासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे त्या दोघांनाही मतदान करता आले नाही. तसेच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांचे मत कमी झाले. त्यामुळे चार वाजता 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले. नियोजित वेळेनुसार पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा असतानाच काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदान पद्धतीला आक्षेप घेतला. त्यामुळे दावे-प्रतिदावे करण्यात आले. मतांची छाननी सुरू असताना रामराजे निंबाळकर यांच्या कोटय़ातील एका मतावर भाजपने आक्षेप घेतला. त्यामुळे निंबाळकर डेंजर झोनमध्ये होते. तसेच भाजपच्या उमा खापरे यांच्या पहिल्या पसंतीच्या मतालाही आक्षेप घेतल्याने त्यांचे मतही बाद ठरवले. खापरे यांच्या मताच्या बाद होण्याला भाजपने आक्षेप घेतला तसेच राष्ट्रवादीनेही रामराजेंच्या मत बाद होण्याला आक्षेप घेतला यामुळे हे दोन्ही वाद पेंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविल्याने मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडली. भाजपचे पुण्याचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे गंभीर आजारी आहेत. मात्र चुरशीच्या निवडणुकीसाठी पक्षादेश आणि कर्तव्य म्हणून ते पुण्याहून मुंबईत आले आणि त्यांना व्हीलचेअरवरून मतदान कक्षात आणण्यात आले. अर्थात त्यासाठी त्यांनी दुसऱयाचे साह्य घेतले. मतदान कक्षात बॅलेट पेपरवर त्यांनी सही केली. मात्र अग्रक्रम नोंदविण्यात त्यांनी दुसऱयाची मदत घेतली. तसेच बॅलेट पेपर मतपेटीत टाकण्यासाठीही त्यांनी साह्यकाची मदत घेतली. यालाच काँग्रेसने आक्षेप घेतला.
मलिक, देशमुख यांना परवानगी नाहीच
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली.
हितेंद्र ठाकूर गटाचा कल काँग्रेसकडे
राज्यसभा निवडणुकीत विजयी उमेदवार आमचा असेल, असे म्हणाऱया बहुजन विकास आघाडीची मते विधान परिषद निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या परडय़ात पडली असण्याची दाट शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर विधानभवनात आले असता काँग्रेस आमदार त्यांच्या स्वागतासाठी हजर होते, त्यामुळे विधान परिषदेत त्यांची मते काँग्रेसकडे वळल्याची शक्यता आहे.
न्यू यॉर्क रिटर्न
बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर न्यूयॉर्कला असल्याने ते मतदानाला उपस्थित राहण्याची शक्यता नव्हती. मात्र मतदान दिवशी पहाटे ते मुंबईत परतले. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला. एकनाथ खडसे यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला विशेषतः राष्ट्रवादीला मत देण्याचे आवाहन केल्याचे समजते.
मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. टिळक आणि जगताप यांनी बॅलेट पेपरवर सही केली. मात्र त्यांच्या उमेदवाराचा प्राधान्यक्रम त्यांच्या सहकाऱयाने नोंदवला. शिवाय मतपत्रिकाही सहकारऱयाने पेटीत टाकली. जर उमेदवार सही करू शकतात तर ते प्राधान्यक्रमही नोंदवू शकतात, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक अधिकारऱयांकडे आक्षेप नोंदवला.
महाविकास आघाडी सरकार असंवेदनशील
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप याच्या मतादनावर काँग्रेसने आक्षेप घेताच हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तर मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप गंभीर आजारा असताना त्यांना अशा परिस्थितीत मतदानासाठी आणणे हा सुद्धा भाजपच्या असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
बावनकुळे यांच्याकडून गाठीभेटी
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे सकाळपासूनच विरोधकांच्या गाठीभेटी घेत होते. त्यांचे पाचही आमदार निवडून येतील असा त्यांना मोठा आत्मविश्वास होता. सकाळी मुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर विधानभवनात धनंजय मुंडे यांची गळाभेटही घेतली. ही गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती.
फडणवीसांचा हास्यविनोद
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत बंब एकीकडू येत असतानाच त्यांच्यासमोरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सतेज पाटील आले. यावेळी फडणवीस यांनी त्यांच्याशी दिलखुलास हास्यविनोद केला. तीन आमदार फुटले असे फडणवीसांनी म्हणताच… तो मी नव्हेच… असे सतेज पाटील म्हणाले. फडणवीसांनीही …अरे… हा तो नव्हेच… असे म्हणत पाटील यांना दाद दिली.
महाविकास आघाडीची 21 मते फुटली
महाविकास आघाडीची 21 मते फुटली असुन पहिल्या पसंतीची 133 मते भाजपला मिळाली असल्याचे भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.तर काँग्रेसची 2 आणि शिवसेनेकडे पहिल्या पसंतीची 55 मते असताना त्यांच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 26 मते मिळाल्याने 52 मते शिवसेनेला मिळाली,त्यामुळे शिवसेनेची 3 मते फुटली असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादीला त्यांच्या हक्काच्या मतापेक्षा 6 मते अधिकची मिळाली आहेत.
खडसेंना रोखण्यात भाजपला अपयश
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सभागृहात जाण्यात भाजप रोखणार अशी भाजपची रणनिती असल्याचे बोलले जात होते,मात्र एकनाथ खडसे यांना विधानपरीषदेत जाण्यापासुन रोखण्यात भाजपला अपयश आले आहे.